डबेवाले जाणार सुट्टीवर, मुंबईकरांची होणार गैरसोय...आता पुढे काय?

  394

मुंबई: शहरातील प्रसिद्ध डबेवाले गावातील वार्षिक जत्रोत्सवासाठी ३ एप्रिल ते ८ एप्रिल दरम्यान रजेवर जाणार आहेत. मुंबई डबावाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली. त्यामुळे सहा दिवस मुंबईतील हजारो कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरी शिजवलेले ताजे अन्न मिळणार नाही.


याबाबत अधिक माहिती देताना सुभाष तळेकर म्हणाले, डबेवाले त्यांचे दैवत खंडोबाचा उत्सव साजरा करण्यासाठी तसेच तसेच ३ ते ८ एप्रिल दरम्यान त्यांच्या गावांतील ग्रामदेवतांच्या यात्रांसाठी आपापल्या गावी जाणार आहेत. रविवारी ९ एप्रिल रोजी मुंबईला ते परत येतील आणि सोमवारपासून ग्राहकांना गरमागरम खाद्यपदार्थांनी भरलेले डबे पोहोचवण्यासाठी पुन्हा कामाला लागतील.


बहुसंख्य डबेवाले हे खेड, अकोला, संगमनेर, जुन्नर, मावळ आणि मुळशी या गावांतील असून उरलेले उर्वरित महाराष्ट्रात विखुरलेले आहेत.


तळेकर यांनी या रजेबाबतची माहिती ग्राहकांना आधीच दिल्याचे सांगितले. ते म्हणाले, "आम्ही आमच्या ग्राहकांना आधीच माहिती दिली होती. मात्र, या सहा दिवसांच्या सुट्यांमध्ये महावीर जयंती आणि गुड फ्रायडे या दोन सरकारी सुट्ट्यांचा समावेश आहे."


दरम्यान, डबेवाल्यांच्या या सुट्टीमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल डबेवाला संघटनेने दिलगिरी व्यक्त केली असून ग्राहकांना विनंती केली आहे की त्यांनी डब्बेवाल्यांचे पैसे कापू नयेत.

Comments
Add Comment

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी