संभाजीनगरमध्ये सर्वांनी शांतता राखावी - गृहमंत्री

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन


नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात आज रात्री दोनच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यावेळी पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. तसेच काही ठिकाणी दगडफेक झाल्याचेही बघायला मिळाले. दरम्यान, संभाजीनगर येथील घटना दुर्दैवी आहे, आता संभाजीनगर येथील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वांनी शांतता राखवी, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

संभाजीनगरमधील तणाव आता निवळला आहे. आम्ही त्याकडे लक्ष ठेऊन आहोत. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही संभाजीनगरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच तणाव निर्माण होईल, असे वर्तन कोणीही करू नये. सर्वांनी शांतता ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, आज महाराष्ट्रासह देशभरात राम नवमीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. रामनवमीनिमित्त संपूर्ण राज्यात विविधकार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर, नाशिक, सातारा, शिर्डी, शेगाव, मुंबईसह राज्यभरातील राम मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी बघायला मिळते आहे. दरम्यान, दरवर्षी प्रमाणे यंदाही शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्यभरातून शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात