भारतात आलेल्या मादी चित्त्याने दिला गोंडस बछड्यांना जन्म, पाहा व्हिडिओ

शेओपूर (वृत्तसंस्था): नामिबियातून भारतात आणलेल्या मादी चित्त्याने दोन दिवसांपूर्वी ४ बछड्यांना जन्म दिला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या पथकानेही आवारात जाऊन याची पुष्टी केली. या बछडयांना जन्म देणारी चित्ता मादी सिया बडा नंबर ४ मध्ये आहे.


गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये नामिबियातून ८ चित्ते भारतात आणण्यात आले होते. १७ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवसादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये चित्तांना आण्यात आले होते. यामध्ये एका मादी चितेचा सोमवारी मृत्यू झाला. ती किडनीच्या आजाराने त्रस्त होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्याला भारतात आणण्याअगोदरच ही समस्या होती.





जानेवारीमध्ये तिला हा आजार झाल्याचे निदान झाल्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तिच्यावर उपचार करत होते, मात्र तिला वाचवता आले नाही. तेव्हापासून भारत सरकारच्या प्रोजेक्ट चित्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान, ४ बछड्यांच्या जन्मामुळे या प्रकल्पावरीव विराम मिळण्याची शक्यता आहे. बछड्यांच्या जन्मावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

भयंकर धक्कादायक! दिवाळीत 'कार्बाइड गन'मुळे १४ मुलांना कायमचे अंधत्व; १२५ हून अधिक जखमी!

भोपाळ : दरवर्षी दिवाळीला फटाक्यांचे वेगवेगळे ट्रेंड समोर येत असातात, यामध्ये चकरीपासून ते रॉकेटपर्यंत वेगवेगळे

सैन्यासाठी ७९,००० कोटींचे मोठे निर्णय!

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने आज भारतीय

देशभरात मतदार यादी बनवण्याचे मोठे काम सुरू!

पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडूत सर्वप्रथम एसआयआर प्रक्रिया नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने देशभरातील

महिला आणि ट्रान्सजेंडरसाठी मोफत प्रवास; काय आहे 'सहेली स्मार्ट कार्ड' योजना?

नवी दिल्ली : भाऊबीजच्या निमित्ताने दिल्ली सरकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोकांना एक मोठी भेट देणार आहे. आजपासून

तेजस्वी यादव '४२०' आरोपी, त्यांच्याकडे विश्वासार्हताच नाही, बिहारला मोदी-नितीश यांचे 'डबल इंजिन' सरकारच हवे!; रवी शंकर प्रसाद यांचा हल्लाबोल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप खासदार रवी शंकर प्रसाद यांनी आज महागठबंधनचे

आता विक्रीआधी होणार प्रत्येक औषधाची सखोल तपासणी

नवी दिल्ली : लहान मुलांना खोकला झाल्यावर औषध म्हणून दिल्या जाणाऱ्या कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे मध्य प्रदेशमध्ये २४