नवी दिल्ली : मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या ९.६ कोटी लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, २०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय किंमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जनतेवरील महागाईचा बोजा कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. या घोषणेवर २०२२-२३ मध्ये ६,१०० कोटी रुपये आणि २०२३-२४ मध्ये ७,६८० कोटी रुपये खर्च होणार असल्याची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी दिली. लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.
पाच रुपयांचे तिकीट दहा रुपये, सहा रुपयांचे तिकीट बारा रुपये मुंबई (प्रतिनिधी) : तोट्यात चाललेल्या…
एनटीसी गिरण्यांच्या जागेची शोध मोहीम सुरू करण्याचे म्हाडाला आदेश मुंबई (प्रतिनिधी) : गिरणी कामगारांच्या घरांच्या…
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो लवकरच होणार दाखल मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई शहरात आणि उपनगरात मेट्रोची कामे वेगाने…
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तांवर मार्केटयार्डात मोठ्या प्रमाणात हापूस आंबा उपलब्ध…
प्रा. नंदकुमार काकिर्डे स्वित्झर्लंडस्थित आय क्यू एअर संस्थेने जागतिक पातळीवरील हवा प्रदूषणाचा व्यापक अहवाल प्रसिद्ध…
उमेश कुलकर्णी अमेरिकेला पुन्हा एकदा महान बनवण्यासाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी पावले उचलत आहेत त्यांनी…