ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले असून "ग्राहक संरक्षण" कायदे अजून कडक केले पाहिजेत!

  218

मराठा महासंघ प्रणित "कंजुमर फोरमच्या" उद्घाटन प्रसंगी दिलीप जगताप यांचे मत!


मुंबई : ग्राहकांना आकर्षित करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण समाजात वाढले असून अश्या प्रकारच्या अनेक तक्रारी घेऊन नागरिक कंजूमर कोर्टात जातात काहीना न्याय मिळतो पण काही प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. काही प्रकरणांत न्याय मिळताना विलंब होतो व काही प्रकरणात अपयश सुद्धा येते. त्या मुळे ग्राहक संरक्षण कायदे अजून कडक केले पाहिजेत असे स्पष्ट मत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताप यांनी व्यक्त केले आहे.


अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अंतर्गत "ऑल इंडिया कंझुमर फोरमची "स्थापना आज दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते.


या नव्या फोरमचे उद्घाटन, सद्गुरू परम पूज्य सद्गुरू अण्णा महाराज चव्हाण, (इंदोर) यांच्या हस्ते आज पार पडले.


या वेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, हल्ली किरकोळ माल खरेदी, आर्थिक गुंतवणूक, तसेच घरे व वाहने घेण्यामध्ये ग्राहकांची सहज फसवणूक केली आहे. काही हॉस्पिटल मध्ये सुद्धा भरमसाठ बिलाची रक्कम आकारण्यात येत असून सर्व सामान्य ग्राहकाना होणारा त्रास लक्षात घेऊन व त्यांच्या शंकांचे निरसन करण्याच्या हेतूने तसेच नागरिकांच्या मागणीवरून महासंघाने या नवीन विभागाची स्थापना केली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन होईल असेच काम करावे.


पहिल्यांदा आपल्या विभागामार्फत मदत व मार्गदर्शन करावे व त्यात यश न आल्यास कंजुमर कोर्टात जाण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे.व ते नक्की करतील असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.


प. पू. सद्गुरू अण्णा महाराज चव्हाण यांच्या उपस्थितीत या नवीन विभागाची स्थापना होत असल्याने त्यांच्या विचारानुसार हा विभाग ग्राहकांना चांगल्या प्रकारे सेवा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


या वेळी महासंघाचे सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्ष संतोष नानवटे, कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे, महिला आघाडी अध्यक्षा वैशाली जोंधळे, मराठा क्रांती मोर्चाचे वीरेंद्र पवार, सदानंद चव्हाण, एस. आर. सावंत, सुवर्णा पवार, प्रशांत सावंत, कविता विचारे, पंकज घाग, अविनाश राणे, अनिल ताडगे, मयूर गुजर, अनंत जाधव, ग्राहक संरक्षण विभागाचे अध्यक्ष ॲड. अरुण जगताप, सरचिटणीस शंकर बने, आदी पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र