पद्मविभूषण आशाताई यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करणार

'या' नाट्यगृहांवर मोफत सन्मानिका (पासेस) उपलब्ध


मुंबई: गेली सात दशके आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले यांना शुक्रवारी २४ मार्च २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजता भव्यदिव्य सोहळ्यात राज्याचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.


कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या व्यक्तीला सर्वोच्च अश्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने राज्य शासनाच्या वतीने गौरविण्यात येते. सन २०२१ या वर्षीचा पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर झाला. तो पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.


यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान सभा अध्यक्ष अँड. राहूल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


हा कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून शिवाजी नाटयमंदिर, दामोदर हॉल, प्रबोधनकार ठाकरे नाटयगृह, दिनानाथ नाटयगृह, काशिनाथ घाणेकर नाटयगृह, वासुदेव बळवंत फडके नाटयगृह, आचार्य अत्रे नाटयगृह, गडकरी रंगायतन, विष्णूदास भावे नाटयगृह या नाटयगृहांवर कार्यक्रमाच्या मोफत सन्मानिका प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश या तत्वावर उपलब्ध होतील.



आवाज चांदण्याचे


या कार्यक्रम प्रसंगी "आवाज चांदण्याचे" या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होणार असून सुदेश भोसले, साधना सरगम, ऋषीकेश कामेरकर, आर्या आंबेकर, बेला शेंडे, मधुरा दातार हे कलाकार आशा भासले यांच्या सदाबहार गीतांचा समुमधुर कार्यक्रम सादर करणार आहेत. अभिनेते सुमित राघवन हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात