बाळासाहेबांच्या मागून 'ती' कुजबूज करणारे उद्धव ठाकरेच!

  283

आमदार नितेश राणेंचा सनसनाटी गौप्यस्फोट


नितेश राणेंनी जाहीरपणे नाव आणि सगळा घटनाक्रमच सांगितला.


मुंबई: काल शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागे नेमका कोणाचा हात होता, या बाबत त्या व्यक्तीचे नाव न घेत सुचक वक्तव्य केले. यावर आज आमदार नितेश राणे यांनी त्या व्यक्तीचे नावच जाहीरपणे सांगितले. नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या मागून कुजबूज करणारे ते उद्धव ठाकरेच होते असे स्पष्ट केले.


नितेश राणे म्हणाले, आपल्यामुळे ठाकरे पिता पुत्रांमध्ये भांडण नको म्हणून त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली की जर तुम्ही नारायण राणेंना परत घेतले तर मी बायको आणि मुलांना सोबत घेऊन मातोश्री सोडून निघून जाईन. पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे हतबल झाले व त्यांनी राज ठाकरे यांना सांगितले की नारायण राणे यांना परत बोलवू नका!


नितेश राणे पुढे म्हणाले, की बाळासाहेब देव माणूस होते. त्यांना सोडणे नारायण राणे यांना खूप जड गेले. आता उद्धव ठाकरे हे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सोडून गेलेले नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले व त्यांनी गौप्यस्फोट केला तर उद्धव ठाकरे यांना तोंड दाखवणे कठीण जाईल. त्यानंतर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले. काल शिवतीर्थावर राज ठाकरे म्हणाले ते वास्तववादी सत्य होते. शिवसेना संपवण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी