बाळासाहेबांच्या मागून 'ती' कुजबूज करणारे उद्धव ठाकरेच!

आमदार नितेश राणेंचा सनसनाटी गौप्यस्फोट


नितेश राणेंनी जाहीरपणे नाव आणि सगळा घटनाक्रमच सांगितला.


मुंबई: काल शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय लघू, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्यामागे नेमका कोणाचा हात होता, या बाबत त्या व्यक्तीचे नाव न घेत सुचक वक्तव्य केले. यावर आज आमदार नितेश राणे यांनी त्या व्यक्तीचे नावच जाहीरपणे सांगितले. नितेश राणे यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना बाळासाहेबांच्या मागून कुजबूज करणारे ते उद्धव ठाकरेच होते असे स्पष्ट केले.


नितेश राणे म्हणाले, आपल्यामुळे ठाकरे पिता पुत्रांमध्ये भांडण नको म्हणून त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना धमकी दिली की जर तुम्ही नारायण राणेंना परत घेतले तर मी बायको आणि मुलांना सोबत घेऊन मातोश्री सोडून निघून जाईन. पुत्र प्रेमापोटी बाळासाहेब ठाकरे हतबल झाले व त्यांनी राज ठाकरे यांना सांगितले की नारायण राणे यांना परत बोलवू नका!


नितेश राणे पुढे म्हणाले, की बाळासाहेब देव माणूस होते. त्यांना सोडणे नारायण राणे यांना खूप जड गेले. आता उद्धव ठाकरे हे केवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र सोडून गेलेले नारायण राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच व्यासपीठावर आले व त्यांनी गौप्यस्फोट केला तर उद्धव ठाकरे यांना तोंड दाखवणे कठीण जाईल. त्यानंतर जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल असेही ते म्हणाले. काल शिवतीर्थावर राज ठाकरे म्हणाले ते वास्तववादी सत्य होते. शिवसेना संपवण्यास उध्दव ठाकरेच जबाबदार असल्याचेही नितेश राणे यांनी सांगितले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.