युवा सेना आणि माथाडी सेनेच्या प्रमुखांना चौकशीला बोलवा

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून शीतल म्हात्रे प्रकरणात खालच्या स्तराच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कधी तरी शोधणार की नाही? यासाठी युवा सेनेचे प्रमुख तसेच माथाडी सेनेचे प्रमुख यांना चौकशीला बोलवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. माहितीच्या मुद्द्याच्या आधारे त्यांनी हा विषय उपस्थित केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक लहान कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. वरुण सरदेसाई नावाचा एक इसम काहीतरी बोलतो आणि त्यानंतर कोणीतरी कार्यकर्ते जातात हे योग्य नाही. कधीपर्यंत साईड अ‍ॅक्टरना अटक करणार? मुख्य चोरांना पकडा ना... कधी तरी उचला ना, असे आवाहनही राणे यांनी केले.


त्या आधी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे सदा सरवणकर यांनी शीतल म्हात्रे यांचा फोटो मॉर्फ करून केल्या जात असलेल्या बदनामीच्या विषयावर भाष्य केले. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जावई गुरुनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. ही फार मोठी साखळी आहे. महिलांना बदनाम करणे हा यांचा उद्योग आहे. शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काल दोन तरुण त्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शंभर नंबरवर फोन करून पोलिसांची कुमक मागवली आणि हा हल्ला टाळला. त्या प्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दादर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी श्री सिद्धिविनायक मंदिर येथील कंत्राटी कर्मचारी आहेत.

Comments
Add Comment

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

मुंबई : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ अनुषंगाने गुरुवार, l १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान

मुंबई विद्यापीठात अत्याधुनिक सीओआरएस स्टेशन उभारणार

भारतीय सर्वेक्षण विभागासोबत सामंजस्य करार मुंबई : देशातील भू-स्थानिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण

वांद्र्यांतील रस्ते विकास महामंडळाच्या मुख्यालयावर फेब्रुवारीत हातोडा

पुनर्विकासातून ८ हजार कोटींचा महसूल अपेक्षित मुंबई : वांद्रे रेक्लेमेशन येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास

उमेदवारांना अनावश्यक 'एनओसी'ची सक्ती का?

जनहित याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी मुंबई : गरज नसतानाही निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबईतील काही ठिकाणी मतदान केंद्रांत बदल

राजकीय पक्षांसह उमेदवारांना माहिती देण्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांचे निर्देश मुंबई : मुंबई

महापालिकेच्या शाळांमध्ये गळती कुठे, उबाठाला दिसते कुठे?

वाह रे वाह... पटसंख्या वाढवण्यासाठी दहावीनंतर बारावीपर्यंतचे कॉलेज सुरू करणार म्हणे उबाठा- मनसेचा वचननामा, आमचा