युवा सेना आणि माथाडी सेनेच्या प्रमुखांना चौकशीला बोलवा

आमदार नितेश राणे यांची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गेल्या दोन-तीन दिवसांपासून शीतल म्हात्रे प्रकरणात खालच्या स्तराच्या कार्यकर्त्यांना पोलीस अटक करत आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाइंड कधी तरी शोधणार की नाही? यासाठी युवा सेनेचे प्रमुख तसेच माथाडी सेनेचे प्रमुख यांना चौकशीला बोलवावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. माहितीच्या मुद्द्याच्या आधारे त्यांनी हा विषय उपस्थित केला. गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक लहान कार्यकर्त्यांना अटक केली जात आहे. वरुण सरदेसाई नावाचा एक इसम काहीतरी बोलतो आणि त्यानंतर कोणीतरी कार्यकर्ते जातात हे योग्य नाही. कधीपर्यंत साईड अ‍ॅक्टरना अटक करणार? मुख्य चोरांना पकडा ना... कधी तरी उचला ना, असे आवाहनही राणे यांनी केले.


त्या आधी माहितीच्या मुद्द्याच्या आधारे सदा सरवणकर यांनी शीतल म्हात्रे यांचा फोटो मॉर्फ करून केल्या जात असलेल्या बदनामीच्या विषयावर भाष्य केले. या प्रकरणी पोलिसांनी मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांचे जावई गुरुनाथ दुर्गे यांना अटक केली आहे. ही फार मोठी साखळी आहे. महिलांना बदनाम करणे हा यांचा उद्योग आहे. शीतल म्हात्रे यांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर काल दोन तरुण त्यांचा पाठलाग करत होते. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसाच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी शंभर नंबरवर फोन करून पोलिसांची कुमक मागवली आणि हा हल्ला टाळला. त्या प्रकरणी दादर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे, असे ते म्हणाले. दादर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी श्री सिद्धिविनायक मंदिर येथील कंत्राटी कर्मचारी आहेत.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)