लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक, वाहकांचे आंदोलन स्थगित

आता नादुरस्त बसेसपासून चालक, वाहक आणि सामान्यांची सुटका


कल्याण: आरटीओ आणि परिवहन व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक वाहकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. केडीएमटीच्या नादुरुस्त बसेसबाबत कल्याण- डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने आज परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.


बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या आणि आज परिवहन व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत नादुरुस्त बसेस दुरुस्त झाल्यानंतरच रस्त्यावर उतरविण्यात येण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली. यावेळी संघटक बाबाजी शिंदे, सरचिटणीस अरविंद तांबे, सचिव किरण सपकाळे, कार्याध्यक्ष विष्णू आव्हाड, संघटक संजय पांडे, संदीप क्षोत्री, शांताराम परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दल्नाथ कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाचे पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगर परिवहन मजदूर युनियनचे पदाधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चेत धोकादायक वाहनांचा वापर रस्त्यावर करू नये. परिवहनमध्ये असलेल्या बसेसची कागदपत्रासह यादी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे देण्यात यावी. तसचे गाड्यांची तक्रार ठेकेदारांकडे न करता अधिकाऱ्यांकडे करावी, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आजचा मोर्चा जरी स्थगित झाला असला तरीही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने दिला आहे.



चालकाच्या तक्रारीचे निवारण झाल्यानंतरच बस रस्त्यावर धावणार


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत सद्यस्थितीत ९० बसेस रस्त्यावर धावत आहेत. युनियनच्या पत्राची दखल घेत परिवहन व्यवस्थापनाने, उपक्रमातील अभियंते निरिक्षक यांना प्रत्येक बस डेपोत आल्यानंतर संबंधित बसच्या चालकाची तक्रार आल्यास या तक्राराचे निराकरण केल्यानंतरच हि बस रस्त्यावर काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरटीओ मार्फत देखील या बसेसची तपासणी होणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत