लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक, वाहकांचे आंदोलन स्थगित

  251

आता नादुरस्त बसेसपासून चालक, वाहक आणि सामान्यांची सुटका


कल्याण: आरटीओ आणि परिवहन व्यवस्थापकांच्या लेखी आश्वासनानंतर केडीएमटी चालक वाहकांचा मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. केडीएमटीच्या नादुरुस्त बसेसबाबत कल्याण- डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने आज परिवहन कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.


बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या आणि आज परिवहन व्यवस्थापकांसोबत झालेल्या बैठकीत नादुरुस्त बसेस दुरुस्त झाल्यानंतरच रस्त्यावर उतरविण्यात येण्याचे आश्वासन मिळाल्याची माहिती युनियनचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिली. यावेळी संघटक बाबाजी शिंदे, सरचिटणीस अरविंद तांबे, सचिव किरण सपकाळे, कार्याध्यक्ष विष्णू आव्हाड, संघटक संजय पांडे, संदीप क्षोत्री, शांताराम परदेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.



उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या दल्नाथ कल्याण डोंबिवली परिवहन उपक्रमाचे पदाधिकारी आणि कल्याण डोंबिवली महानगर परिवहन मजदूर युनियनचे पदाधिकारी यांच्या समवेत झालेल्या चर्चेत धोकादायक वाहनांचा वापर रस्त्यावर करू नये. परिवहनमध्ये असलेल्या बसेसची कागदपत्रासह यादी उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे देण्यात यावी. तसचे गाड्यांची तक्रार ठेकेदारांकडे न करता अधिकाऱ्यांकडे करावी, या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. आजचा मोर्चा जरी स्थगित झाला असला तरीही दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास कामबंद करण्याचा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिवहन मजदूर युनियनने दिला आहे.



चालकाच्या तक्रारीचे निवारण झाल्यानंतरच बस रस्त्यावर धावणार


कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत सद्यस्थितीत ९० बसेस रस्त्यावर धावत आहेत. युनियनच्या पत्राची दखल घेत परिवहन व्यवस्थापनाने, उपक्रमातील अभियंते निरिक्षक यांना प्रत्येक बस डेपोत आल्यानंतर संबंधित बसच्या चालकाची तक्रार आल्यास या तक्राराचे निराकरण केल्यानंतरच हि बस रस्त्यावर काढण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आरटीओ मार्फत देखील या बसेसची तपासणी होणार असल्याचे परिवहन व्यवस्थापक दीपक सावंत यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)