"तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला?"

सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाचा सवाल


नवी दिल्ली (प्रतिनिधी ): तीन वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा काय मोडला? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनजंय चंद्रचुड यांनी उपस्थित केला. तसेच सरकार पडेल असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी यावेळी केली.


घटनापीठासमोर आज राज्यपालांतर्फे महाधिवक्ता अॅड. तुषार मेहता युक्तिवाद केला आहेत. तुषार मेहता यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत राज्यपालांनी सत्तासंघर्षाप्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे आम्ही अत्यंत निराश आहोत, असे स्पष्ट मत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी व्यक्त केले. सत्तासंघर्ष प्रकरणात तत्कालीन राज्यपालांनी घेतलेली भूमिका ही लोकशाहीसाठी अत्यंत निराशाजनक आहे. सरकार पडेल, असे कृत्य राज्यपालांनी करायला नको होते, असे खडेबोलही त्यांनीसुनावले.


तसेच, नेमकी कोणती घटना घडली ज्यामुळे राज्यपालांनी ठाकरेंना बहुमत चाचणीचे आदेश दिले, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. त्यावर शिवसेनेच्या ३४ बंडखोर आमदारांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते, असे उत्तर अॅड. तुषार मेहता यांनी दिले. त्यावर बंडखोर आमदारांनी केवळ गटनेता आणि प्रतोद नियुक्तीसाठी पत्र दिले होते, त्यामुळे हे पत्र बहुमत चाचणीसाठी पुरेसे नव्हते. तरीही राज्यपालांनी तसे गृहित धरुन बहुमत चाचणीचे आदेश दिले, असे सरन्यायाधीशांनी सुनावले.



घटनेमुळे महाराष्ट्राची बदनामी


राज्यपालांनी बहुमत चाचणीचा आदेश दिल्याने सरकार कोसळण्यास मदत झाली. एकदा सरकार स्थापन झाल्यावर राज्यात स्थिर सरकार असावे, अशी भूमिका घेणे हे राज्यपालांचे कर्तव्य आहे. कारण सरकार स्थिर असेल तरच आपण सत्ताधाऱ्यांना विविध कामांसाठी जबाबदार धरू शकतो. मात्र, महाराष्ट्रात तसे झाले नाही. राज्यात जे काही झाले ते अत्यंत चुकीचे होते. महाराष्ट्र हे अतिशय सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाते. मात्र, अशा घटनेमुळे राज्याबद्दल अतिशय अयोग्य पद्धतीने बोलले गेले, असे सरन्यायाधीश म्हणाले.

Comments
Add Comment

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील