“शीतल म्हात्रेंच्या मॉर्फ केलेल्या व्हिडीओचा मास्टरमाईंड कलानगरमध्ये”

आमदार नितेश राणे यांचा ठाकरे गटावर गंभीर आरोप


मुंबई : शिवसेनेच्या प्रवक्त्या तथा उपनेत्या शीतल म्हात्रे यांचा आमदार प्रकाश सुर्वे यांच्याबरोबरचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बघायला मिळाले. यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना या व्हिडीओवरून विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाला लक्ष्य केले.


“शीतल म्हात्रेंचा मॉर्फ केलेला व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. यासंदर्भातील तक्रार दाखल करण्यात आली असून त्या तक्रारीनुसार हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागे मानस कुवर आणि अशोक मिश्रा ही दोन व्यक्ती असल्याचे पुढे आले आहे. हे दोघेही ठाकरे गटाचे पदाधिकारी आहेत. तसेच हा व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मास्टरमांईंड कलानगरमध्ये बसला आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हे जर युवासेनेचे पदाधिकारी असतील तर युवासेनेच्या प्रमुखांनी यासंदर्भात स्पष्टीकरण द्यावे”, अशी मागणीही त्यांनी केली.


जे ठाकरे गटाबरोबर राहतील, ते चांगले. जे त्यांना सोडून गेले, त्यांची बदनामी करण्याचा प्रकार फार पूर्वीपासून सुरू आहे, अशी टीकाही त्यांनी केली. तसेच मॉर्फ व्हिडीओ तुम्हालाच करता येतो, असे नाही. “तुम्ही जर हा खेळ सुरू करत असाल, तर याचा शेवट आम्हाला करता येतो. आम्हीही रात्री ७.३० नंतरचे काही व्हिडीओ बाहेर काढू. ८ जून रोजीचे काही व्हिडीओ आमच्याकडे सुद्धा आहेत”, असेही ते म्हणाले.

Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत