संजय राऊत नालायक माणूस, त्याचे संरक्षण काढा!

आमदार नितेश राणे यांचा संजय राऊतांवर गंभीर आरोप


मुंबई : विधीमंडळाचा 'चोरमंडळ' असा उल्लेख करणा-या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एकेरी भाषेत सडकून टीका केली.


संजय राऊत सारख्या नालायक माणसाकडून दुसरी कोणतीही अपेक्षा नाही. हे विधिमंडळ नसते तर तो खासदार पण झाला नसता. थोडी जरी लाज राहिली असेल तर त्याने खासदारकीचा राजीनामा द्यावा. चौकाचौकात त्याची धिंड काढली पाहिजे. संजय राऊतला आमच्या हवाले करा, जेणेकरून त्याची धिंड काढू शकतो. संजय राऊत याच्यावर कायदेशीर प्रक्रिया झालीच पाहिजे, संजय राऊतची सरकारने सुरक्षा काढावी, अशी मागणी नितेश राणे यांनी विधानसभेत केली.



संजय राऊतचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे. तो सामनात येण्याआधी त्याचे सर्व लेख शिवसेनेच्या विरोधात होते. हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या पत्नीचे पटत नाही, असे संजय राऊतने लिहिले होते. राऊतांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात. ते सरकारने दिलेले संरक्षण आहे,” असे नितेश राणे यांनी म्हटले.


तसेच आपल्याला रोज सकाळी संजय राऊतचे ऐकावे लागते. महाराष्ट्राला याची गरज आहे का? असा सवालही नितेश राणे यांनी केला.


त्याचे मार्मिकमध्ये छापलेले कार्टून बघा. देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असे छापू शकतात का? त्यांना शिव्या देऊ शकतात का? संजय राऊतांचे १० मिनिटे संरक्षण काढायला सांगा, ते उद्या सकाळी परत दिसणार नाही, एवढा शब्द देतो,” असे वक्तव्य राणेंनी केले.

Comments
Add Comment

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील

प्रभादेवीतील प्रभाग १९४ मनसेला सोडण्यास उबाठा गटाचा विरोध

मनसेला सोडल्यास उबाठात बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई : दोन्ही ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केल्यांनतर आता जागा

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती