संजय राऊतांविरोधात 'हक्कभंगा'ची मागणी

सर्वपक्षीय आमदार एकवटले; विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणे राऊतांना भोवणार?


मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळाने झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख 'चोरमंडळ' असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळाला 'चोरमंडळ' म्हणणे संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राऊतांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घेतली आहे.


भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. त्यावरील चर्चेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊंतावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच संजय राऊतांनी केलेले विधान हे संपूर्ण विधीमंडळातील सदस्यांना उद्देशून केले आहे आणि हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यांनी विधीमंडळाचा अपमान केला आहे, त्यामुळे अशांवर कारवाई केली गेली पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले.


राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचे म्हटले. पण त्यांनी संजय राऊत यांचे थेट नाव घेणे टाळले. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असे विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरेच असे विधान केले आहे का? हेही तपासून पाहिले गेले पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केले असेल तर त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.


दरम्यान, राहुल नार्वेकर हे हक्कभंगाच्या नोटीसवर आदेश देत असतानाच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाची नोटीस आता हक्कभंग समितीकडे पाठवली जाणार आहे.

Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात