मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज सुरू झाले आणि आजच्या दिवसाची सुरुवात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या गदारोळाने झालेली पाहायला मिळाली. खासदार संजय राऊत यांनी विधीमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केल्याने सत्ताधाऱ्यांनी थेट विधीमंडळात हा मुद्दा उपस्थित करत हक्कभंगाची मागणी केली आहे. त्यामुळे विधीमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हणणे संजय राऊतांना भोवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राऊतांच्या या विधानाविरोधात सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घेतली आहे.
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय राऊतांविरोधात हक्कभंगाची मागणी करणारे पत्र दिले. त्यावरील चर्चेत भाजपा आमदार आशिष शेलार यांनी संजय राऊंतावर कडक कारवाईची मागणी केली. तसेच संजय राऊतांनी केलेले विधान हे संपूर्ण विधीमंडळातील सदस्यांना उद्देशून केले आहे आणि हे राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नाही. त्यांनी विधीमंडळाचा अपमान केला आहे, त्यामुळे अशांवर कारवाई केली गेली पाहिजे, असे आशिष शेलार म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आशिष शेलार यांच्या मताशी सहमज असल्याचे म्हटले. पण त्यांनी संजय राऊत यांचे थेट नाव घेणे टाळले. जर एखादी व्यक्ती विधीमंडळाबाबत असे विधान करत असेल तर ते नक्कीच अशोभनीय आहे. पण त्यांनी खरेच असे विधान केले आहे का? हेही तपासून पाहिले गेले पाहिजे. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जावा. त्यांनी जर तसं विधान केले असेल तर त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असे अजित पवार म्हणाले. काँग्रेस आमदार बाळासाहेब थोरात यांनीही संजय राऊतांच्या विधानाशी सहमत नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, राहुल नार्वेकर हे हक्कभंगाच्या नोटीसवर आदेश देत असतानाच विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. यामुळे सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. संजय राऊतांविरोधातील हक्कभंगाची नोटीस आता हक्कभंग समितीकडे पाठवली जाणार आहे.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…