महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांबाबत भूमिका स्पष्ट करा!

मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील २४ महापालिका, जिल्हा परिषदांसह पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप का घेतल्या नाहीत? या संदर्भात दोन आठवड्यांत याबाबत प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.


निवडणुका घेणे हे घटनेने बंधनकारक केलेले असताना गेल्या दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या कारणास्तव मुंबईतील रहिवासी रोहन पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, दर पाच वर्षांनी निवडणुका घ्याव्यात. या घटनेने घातलेल्या नियमाचे राज्य निवडणूक आयोगाने उल्लंघन केले आहे. तसेच आयोगाची ही कृती देशद्रोही असल्याने या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.


उपरोक्त याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी आयोगाच्या वतीने वकील सचिंद्र शेट्ये, तर याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील प्रकाश आंबेडकर यांनी युक्तिवाद केला.


वकील आंबेडकर म्हणाले की, निवडणूक आयोगाचे अधिकार कोणीच हिरावून घेऊ शकत नाहीत, निवडणुका प्रक्रिया राबवण्याचा आयोगाचा अधिकार अबाधित आहे. तरीही निवडणूक आयोगाकडून निवडणुका का घेतल्या जात नाहीत?


याचिकाकर्त्यांनी पुढे म्हटले आहे की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडल्या आहेत. परिणामी त्यांच्या माध्यमातून होणारा विकास रखडला आहे. सद्यस्थितीत सर्वच ठिकाणी प्रशासकांच्या हाती कारभार आहे. सामान्य माणूस प्रशासकांपर्यंत थेट पोहोचू शकत नाही. राजकीय घडामोडींमुळेच निवडणुका रखडलेल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने पाच वर्षांनी निवडणुका घेण्याच्या घटनेने घातलेल्या नियमाचे हेतुत: उल्लंघन केले आहे. घटनात्मक कर्तव्यांचे पालन केले नाही म्हणून निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावेत.


दरम्यान, निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागतो. मुंबई महापालिका सभागृहाचा कालावधी संपण्यापूर्वी प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र त्याआधीच महाविकास आघाडीने प्रभाग संख्या २२७ वरून २३६ करण्याचा निर्णय घेतला. आयोगाने त्यानुसार प्रक्रिया सुरू केली. सर्वोच्च न्यायालयानेही निवडणूक कार्यक्रम राबवण्यास परवानगी दिली. सत्तांतरानंतर नव्या सरकारने प्रभाग संख्या पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आधीची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. या घडामोडींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात अडचण येत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment

Atul Save : भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे काम येत्या वर्षभरात पूर्ण करणार- मंत्री अतुल सावे

पुणे : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्य शासनाकडून विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा

"महाबीजची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग ठरतील" : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या नेतृत्वाखाली महाबीजचा नवा इतिहास; चार नाविन्यपूर्ण उत्पादनांची

Buldhana Shocking News : क्रूर बापाने पोटच्या लेकीचं शरीर कापलं अन् शिर धडावेगळे करत...बुलढाण्यात धक्कादायक प्रकार

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात (Buldhana News) उघडकीस आलेल्या एका हत्याकांडाने संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाला (Madhya Pradesh)

NEET paper leak : नीट' परीक्षा घोटाळ्याचे पुणे कनेक्शन उघड! ब्युटी पार्लरमध्ये मोठं जाळं ? महिलेला बेड्या; 'व्हॉट्सॲप चॅट्स' पोलिसांच्या हाती

पुणे : संपूर्ण देशात खळबळ माजवून देणाऱ्या 'नीट' (NEET) परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता पुण्यातही सापडले

Solapur News : सोलापुरात तब्बल २ कोटींच्या 'एमडी' ड्रग्जसह तस्करांची टोळी गजाआड!

सोलापूर : सोलापूर शहरात अमली पदार्थांचा विळखा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर, शहर गुन्हे शाखेने एक अत्यंत धडक

NEET UG 2026 Paper Leak : मोबाईल बंद करून लपलेला संशयित अखेर CBI च्या जाळ्यात; NEET पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगरमधून संशयिताला घेतले ताब्यात

अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक मोठी