रिझर्व बँकेने पाच बँकांवर घातले निर्बंध, महाराष्ट्रातील 'या' दोन बँकांचा समावेश

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने विविध राज्यांतील ५ सहकारी बँकांवर विविध निर्बंध लावले आहेत. यात महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश आहे. हे निर्बंध ६ महिने कायम राहणार आहेत. या निर्बंधामध्ये पैसे काढण्यावरही बंदी असल्याने आता सदर बँकांचे ग्राहक बँकेत जमा केलेले पैसे काढू शकणार नाहीत. आरबीआयच्या पूर्व परवानगीशिवाय या बँका कोणत्याही नवीन ग्राहकाला कर्ज देऊ शकणार नाहीत.


आरबीआयने म्हटले आहे की, या बँकांच्या कामकाजाचा आढावा घेऊनच ही बंदी हटवण्याचा किंवा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल. आरबीआयला बँकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याचे दिसले तर बंदी उठवली जाणार आहे. या बँकांचा परवाना रद्द करण्यात आला नाही, असेही आरबीआयने यावेळी स्पष्ट केले आहे.



खालील ५ बँकांवर आरबीआयकडून बंदी


रिझव्‍‌र्ह बँकेने एचसीबीएल को-ऑपरेटिव्ह बँक लखनौ (उत्तर प्रदेश), शिमशा को-ऑपरेटिव्ह बँक नियामिथा, मद्दूर (कर्नाटक), उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक, उरावकोंडा (आंध्र प्रदेश) या इतर राज्यातील बँकांवर तर महाराष्ट्रातील आदर्श महिला नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक, अकलूज या बँकांवर निर्बंध घातले आहेत.


यातील उरावकोंडा को-ऑपरेटिव्ह टाऊन बँक आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँकेचे ग्राहक आता त्यांच्या बँकेमधील ठेवींमधून फक्त ५ हजार रुपये काढू शकतात. उर्वरित बँकांचे ग्राहक त्यांच्या खात्यामधून कोणतीही रक्कम काढू शकणार नाहीत.


भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, पाचही सहकारी बँकांच्या पात्र ठेवींना, ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम मिळू शकते.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे