पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या!

  245

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना देखील राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील कचराकुंड्या हटवून त्याठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या असे बोलण्याची वेळ नागरिकांवर आली असून जागोजागी उभ्या राहणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे याकडे लक्ष वेधत या गाड्या हटविण्याची मागणी केली आहे.


कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क, टेलीफोन एक्स्चेंज, फडके मैदान, तसेच इतर अनेक मुख्य ठिकाणी संध्याकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा उचलणाऱ्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्या उभ्या असतात. या मोठ्या आरसी गाड्यांमध्ये इतर अनेक घंटा गाड्या कचरा आणून टाकत असतात. हा कचरा टाकतांना बराचसा कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी सुद्धा खाली सांडते. रात्रभर या गाड्या याठिकाणी उभ्या असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.


तर अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या हटविल्याने आणि वेळेवर घंटागाड्या येत नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असून या आधी कचरा हा कचरा कुंडीच्या आसपासच पडायचा मात्र आता १५ ते २० फुटांपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते.


याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांना वारंवार सांगून देखील यावर कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे.


याबाबत मोहन उगले यांनी उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली असता, अशा प्रकारे रस्त्यावर कचरा गाड्या उभ्या न करता पालिकेच्या आरक्षित भूखंडावर या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. तरी देखील गाड्या रस्त्यावर उभ्या असलेल्या आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत

व्होट जिहादचे उत्तर हिंदूंनी एकत्रितपणे दिले : डॉ. विखे

अ.नगर : आ.संग्राम जगताप हे एक हिंदुत्वाचा विचार आहे.त्यांना समर्थन देण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो आहे.माझ्या

नांदगाव राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार

माजी नगरसेवक वाल्मीक टिळेकर यांचा शेकडो सर्मथकांसह शिवसेनेत प्रवेश नांदगाव : नांदगाव नगरपालिकेचे राष्ट्रवादी

'कॅप्टन कूल' या प्रसिद्ध टोपणनावाच्या ट्रेडमार्कसाठी धोनीचा अर्ज

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीने 'कॅप्टन कूल' या नावासाठी ट्रेडमार्क अर्ज दाखल केला आहे. हे नाव चाहते त्याच्या थंड