पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या!

Share

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी अनेक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये कचराकुंडी मुक्त शहर ही संकल्पना देखील राबविण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील कचराकुंड्या हटवून त्याठिकाणी घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्यात येतो. मात्र पूर्वीच्या कचरा कुंड्या चांगल्या होत्या असे बोलण्याची वेळ नागरिकांवर आली असून जागोजागी उभ्या राहणाऱ्या कचऱ्याच्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्यांच्या दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत शिवसेना उपशहर प्रमुख तथा माजी नगरसेवक मोहन उगले यांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अतुल पाटील यांचे याकडे लक्ष वेधत या गाड्या हटविण्याची मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क, टेलीफोन एक्स्चेंज, फडके मैदान, तसेच इतर अनेक मुख्य ठिकाणी संध्याकाळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कचरा उचलणाऱ्या मोठ्या आरसी गाड्या आणि घंटा गाड्या उभ्या असतात. या मोठ्या आरसी गाड्यांमध्ये इतर अनेक घंटा गाड्या कचरा आणून टाकत असतात. हा कचरा टाकतांना बराचसा कचरा, दुर्गंधीयुक्त पाणी सुद्धा खाली सांडते. रात्रभर या गाड्या याठिकाणी उभ्या असल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरते. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

तर अनेक ठिकाणच्या कचराकुंड्या हटविल्याने आणि वेळेवर घंटागाड्या येत नसल्याने नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असून या आधी कचरा हा कचरा कुंडीच्या आसपासच पडायचा मात्र आता १५ ते २० फुटांपर्यंत कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते.

याबाबत उपायुक्त अतुल पाटील यांना वारंवार सांगून देखील यावर कारवाई होत नसल्याने आयुक्तांनी याप्रकरणी लक्ष देण्याची मागणी मोहन उगले यांनी केली आहे.

याबाबत मोहन उगले यांनी उपायुक्त अतुल पाटील यांची भेट घेतली असता, अशा प्रकारे रस्त्यावर कचरा गाड्या उभ्या न करता पालिकेच्या आरक्षित भूखंडावर या गाड्या उभ्या करण्याच्या सूचना संबंधित विभागाला केल्या आहेत. तरी देखील गाड्या रस्त्यावर उभ्या असलेल्या आढळल्यास संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Recent Posts

Riteish Deshmukh : ‘हा’ कलाकार नदीत वाहून गेला म्हणून; रितेश देशमुखने थांबवलं ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं शूटिंग

सातारा: रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आला आहे. या चित्रपटाचं शूट…

1 minute ago

Kesari Chapter 2 : अक्षय कुमारचा ‘केसरी 2’ फ्लॉप! ६ दिवस उलटूनही गल्ला रिकामाच

मुंबई : बॉलीवूड (Bollywood) चित्रपटसृष्टीत सातत्याने नवनवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांत…

21 minutes ago

उधमपूरमध्ये चकमक सुरू, जवान हुतात्मा

उधमपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. यानंतर संपूर्ण जम्मू…

35 minutes ago

पाकिस्तानचे अधिकृत ट्विटर हँडल भारतात ब्लॉक

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.…

1 hour ago

गौतम गंभीरला ISIS Kashmir ने दिली ठार मारण्याची धमकी

नवी दिल्ली : भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) गौतम गंभीर याला आयसिस…

2 hours ago

Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला…

2 hours ago