आमदार नितेश राणे यांनी घेतली आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची भेट

ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज बांधवांवर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ठाणे यांच्याकडून वारंवार अन्याय होत होता. विशेष करून ठाणे येथील दि. जी. पावरा, उपायुक्त तथा सहआयुक्त, जात पडताळणी समिती, ठाणे यांच्याकडून पूर्वग्रह दूषित निर्णय दिले जात होते. त्यामुळे सिंधुदुर्गातील ठाकर समाजातील विद्यार्थी व कर्मचारी यांच्यावर अवैध ठरून उच्च न्यायालयात धाव घेण्याची वेळ येत होती. उच्च न्यायालयाकडून तात्काळ सकारात्मक निर्णय होत होते. मात्र या सर्वात ठाकर समाज बांधवांची प्रचंड आर्थिक हानी होत होती.


या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे लोकप्रिय आमदार नितेश राणे यांनी आज मंगळवारी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांची मंत्रालयात भेट घेतली. भेटीदरम्यान अन्यायकारक उपायुक्त पावरा यांची तात्काळ बदली करण्याचे आश्वासन गावित यांनी राणे साहेबांना दिले तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर बांधवांवर कोणताही अन्यायकारक निर्णय लादला जाणार नाही याची हमी दिली.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच मुंबई स्थित सर्व ठाकर समाज बांधवांनी आमदार नितेश राणे यांचे आभार मानले आहेत, तसेच आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Thane News : ठाणे हादरलं! 'जीवंत सोडणार नाही' धमकी दिली अन् १७ वर्षीय मुलाने मैत्रिणीला... बंद घरात नेमकं काय घडलं?

ठाणे : प्रेमसंबंधातून झालेल्या वादातून एका अल्पवयीन मुलाने आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीला पेटवून दिल्याचा अत्यंत

आपला दवाखान्यातील डॉक्टर आणि कर्मचारी यांचा पगार ठाणे महापालिका बॅंक गॅरंटीतून देणार

महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे आरोग्य विभागाला निर्देश ठाणे : आपला दवाखाना चालवण्याची जबाबदारी असलेल्या मेड

ठाण्यात वाघीण मैदानात! चित्रा वाघ ॲक्शन मोडवर; वाघ यांच्या एन्ट्रीने अनेकांची धाकधूक वाढली!

कळवा: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज

नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त ठाणे  : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा

सुजाता मडके या शहापूरच्या कन्येची ‘इस्रो’मध्ये थरारक झेप

ठाणे : ‘यशाला शॉर्टकट नसतो, पण जिद्द, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास असेल तर अवकाशातही भरारी घेता येते,’ या शब्दात

यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी गुड न्यूज, नोव्हेंबरपासून जूनपर्यंत तब्बल ६८ विवाह मुहूर्त

ठाणे (वार्ताहर) : तुळशी विवाहानंतर लग्नसराईचा धडाका सुरू होतो. यंदा नोव्हेंबरपासून जूनअखेरपर्यंत तब्बल ६८ विवाह