भिवंडीत कंटेनरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू

भिवंडी : भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून कविता पंजनी या संगम पाडा येथील ३२ वर्षीय महिलेचा रोड क्रॉस करीत असताना कंटेनरच्या धडकेत चाकाखाली सापडल्याने जागीच मृत्यू झाला.


प्राथमिक माहिती अशी की, कंटेनर खाडीपार हुन छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या दिशेने जात असताना कंटेनरची धडक लागल्याने महिलेचा जागीच चिरडून मृत्यू झाला.


अवजड वाहनांना शहरात बंदी असताना सुद्धा अशी वाहने शहरात सर्रासपणे ये-जा करीत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.


कंटेनर चालकाला स्थानिक रिक्षाचालक व नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पुढील कारवाई करीता मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आला आहे.

Comments

रवींद्र गुरव    February 22, 2023 11:55 AM

भिवंडीत अशा घटना रोजच घडत अहेत,पोलीस फक्त बघत असतात.त्याना काहीच घेणेदेणे नाही.शेलार गावात रस्त्याचे काम चालूअसताना कोणत्याही पध्दतिने नियोजन न करता प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना रोज नागरिकांना करावा लागत आहे.फक्त हप्ते गोळा करणे एकच काम चालू आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असताना राजकीय नेते यांची शून्य जबाबदारी आहे का ?

Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला