वसईत तामतलाव, स्वामी समर्थ मठ।।

Share
  • विलास खानोलकर

अनंत कोटी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ ह्यांच्या काष्ठ पादुकांची प्राण प्रतिष्ठा तसेच श्री स्वामी समर्थांची तसबीर ह्यांचा स्थापना सोहळा, मंगळवार ३ जुलै २०१२ (गुरुपौर्णिमा) ह्या दिनी वसईतील सुतार आळी येथे मोठ्या थाटात भक्ती भावाने साजरा झाला.

मुंबईतील स्वामी भक्त श्री सच्चिदानंद भगवंतराव दादरकर यांच्या वसईतील वडिलांच्या मिळकतीचे कालांतराने ‘दीपलक्ष्मी गृहसंकुल’ निर्माण झाले. त्यापूर्वी त्यांचे वडील भगवंतराव नारायण दादरकर यांच्या या जागेत असलेल्या औदुंबराच्या छायेत दत्तमंदिर उभारावे अशी तीव्र इच्छा होती; परंतु या जमिनीत गृहसंकुल बांधल्यामुळे तेथे स्वामी समर्थांचा स्वतंत्र मठ बांधता आला नाही. त्यामुळे सच्चिदानंद दादरकरांनी आजूबाजूच्या जागेत मठ बांधण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु त्यांना यश मिळाले नाही, अखेर, त्यांनी आपल्या स्वतःच्या राहत्या जागेत त्यांची आई कै. रतनबाई आणि वडील कै. भगवंतराव ना. दादरकर यांच्या स्मरणार्थ श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठाची स्थापना केली. ह्यासाठी गावातील स्थानिक माननीय सुभाष हरि गोरक्ष, सुनील रामनाथ गोरक्ष, प्रफुल्ल पाठारे आणि छाया गिरी, डॉ. गालवणकर, रमेश खानविलकर, सिंधू नेरकर, चेतन देसाई, मनोज मयेकर, डॉ. सामंत इतर स्थानिक मंडळी यांनी भक्तिभावाने सहकार्य दिले. सत्य गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ्यांना श्री सच्चिदानंद दादरकरांच्या वडिलांच्या इच्छेनुसार औदुंबराच्या छायेत स्थानापन्न व्हावयाचे होते. म्हणून हे सर्व स्वामी समर्थांनी घडवून आणले. येथील स्वामी भक्तांची आपल्या गावात श्री स्वामी समर्थांचा मठ असावा अशी खूप इच्छा होती, ती श्री स्वामी समर्थांनी पूर्ण केली. हा अस्मरणीय योग भक्तांच्या मनातून कधीही पुसला जाणार नाही.

वसई येथील या स्वामी समर्थांच्या मठातील मखराची उत्कष्ट काष्ठ सजावट स्वामी भक्त सुनील रामनाथ गोरक्ष यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली झाली. हा मठ वसई स्टेशन (पश्चिम) येथून रिक्षाने १२ -१५ मि. अंतरावर आहे. जवळ तामतलाव आधुनिक सुशोभित केल्यामुळे वातावरण आनंदमय व उत्साही असते. स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, ही विनंती.

vilaskhanolkardo@gmail.com

Recent Posts

पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला कशी देणार प्रतिक्रिया, गुरुवारी बिहारमध्ये कळणार

दरभंगा : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याला भारताकडून कशी प्रतिक्रिया दिली जाणार यावरुन तर्कवितर्कांना…

13 minutes ago

१० कोटींचा बँक घोटाळा! वरिष्ठ मॅनेजर, उद्योजक व एजंटला ५ वर्षांची शिक्षा

मुंबई : तब्बल १० कोटी रुपयांच्या बनावट 'लेटर ऑफ क्रेडिट' (LC) प्रकरणात सीबीआय न्यायालयाने तीन…

25 minutes ago

Sachin Tendulkar: “हल्ल्याच्या बातमीने धक्काच बसला…” पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट

मुंबई: मंगळवारी दि २२ एप्रिल रोजी जम्मू - काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील पर्यटकांच्या…

55 minutes ago

Mumbai BMW hit and run case : गाडी थांबवता आली असती, पण माणुसकी हरवली…

वरळी BMW अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली हळहळ मुंबई : काही अपघात हे केवळ…

56 minutes ago

Ladki Bahin Yojana : तारीख ठरली! लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार १५०० रुपये

मुंबई : महायुती सरकारने (Mahayuti) महिलांच्या आर्थिक दृष्टया सक्षमीकरणासाठी 'लाडकी बहीण योजना' (Ladki Bahin Yojana)…

1 hour ago

Ram Charan: अभिनेत्याच्या जिद्दीला सलाम! केलं कठोर व्रत आणि अखेर चित्रपटाला मिळालं ऑस्कर!

मुंबई: जेव्हा चित्रपट रिलीज होणार असतो तेव्हा प्रेक्षकांना तो आवडेल की नाही , चित्रपटाला यश…

1 hour ago