पेण-खोपोली मार्गावर भीषण अपघात, तीन ठार; तर चार गंभीर जखमी

  202

पेण: पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे आज सायंकाळी ट्रक आणि इको कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे परिसरातील वाहतूक बराच काळ खंडित झाली होती. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे कोल्हापूरला बाळुमामाच्या यात्रेसाठी इको कारने जात होते.


या अपघाताचे सविस्तर वृत्त असे की, इको कारमधून भाविक बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. तर ट्रक खोपोलीहून पेणकडे येत होता. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की त्यामध्ये इको कार मधून प्रवास करणारे चालक नागेश विक्रम दिंडे (वय-२७), प्राजक्ता नागेश दिंडे (वय-२५) आणि विक्रम गोविंदराव दिंडे (वय-५०) हे जागीच ठार झाले. तर याच कार मधील गजानन चंदन वडगावकर (वय-१३), विकी विठ्ठल श्रीरामे (वय-१५), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय-२२), कविता विक्रम दिंडे (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.



अपघाताचे वृत्त समजताच परिसरातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. तर कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. कल्पेश यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले. दरम्यान, वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला.


सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत. या अपघातामुळे पेण-खोपोली मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजुला केल्यावर ही वाहतूक पूर्ववत सुरु झाली. काही काळासाठी या मार्गावरील वाहतूक आपटा-रसायनी-पनवेल मार्गे वळविण्यात आली होती.



अपघातग्रस्त परिवार मुळचा कोल्हापूरचा


या अपघातातील दिंडे परिवार हा मुळचा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने हे पेणमधील फणसडोंगरी परिसरात गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य करीत आहेत. दरवर्षी ते कोल्हापूर जिल्ह्यातील बाळुमामाच्या यात्रेसाठी जात असतात. यंदाही यात्रेसाठी निघाले असतानाच त्यांच्या परिवारावर हे मोठा संकट कोसळे. अपघाताचे वृत्त पेण फणसडोंगरी परिसरात पोहोचताच दिंडे परिवाराशी संबंधितांनी शोक प्रकट केला.

Comments
Add Comment

Maharashtra Assembly Monsoon Session 2025: शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकार आणि विरोधकांमध्ये खडाजंगी, कामकाज दिवसभरासाठी तहकूब

शेतकरी विषयावर विरोधकांनी आज पूर्ण दिवस कामकाजावर बहिष्कार टाकला मुंबई: महाराष्ट्र विधानसभेत मंगळवारी, १ जुलै

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत