स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच

  124

मुंबई : निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना दिले आहे. त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात असतानाच आता अभिनेत्री कंगना राणावतने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कंगना राणावत आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे.


उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कंगनाचे मुंबईतील अनधिकृत कार्यालय तोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि कंगनाचा वाद चांगलाच रंगला होता. आयोगाच्या कालच्या निकालानंतर कंगनाने एक ट्विट केले आहे.


त्या ट्विट मध्ये तिने लिहिले आहे की, "वाईट वागल्यानंतर देवांच्या राजाला अर्थात इंद्रालादेखील त्याची शिक्षा मिळत असते. हा तर फक्त एक नेता आहे. ज्यावेळी त्यांनी माझं घर तोडलं, त्यावेळीच मला वाटलं होतं की यांचे वाईट दिवस आता सुरु होणार. एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला देव शिक्षा देतोच. तो आता कधीच उठणार नाही."




Comments
Add Comment

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत मोठी घोषणा

मुंबई : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत

आंदोलन तर संपले, पण लाखोंच्या संख्येत मुंबईत आलेल्या भाकरी-चटणीचे काय? उरलेले अन्न आणि साहित्य गरजूंना केले दान

मुंबई: मराठा आंदोलनादरम्यान राज्याच्या कानाकोपऱ्यातून नवी मुंबईत चटणी-भाकरीच्या शिदोरीचा महापूर आला होता.

Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळात १५ महत्त्वाचे निर्णय, मुंबई-ठाणे-मेट्रो प्रकल्पांना गती, सविस्तर वाचा

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज (दि. ३ सप्टेंबर) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

Arun Gawli free from Jail : मोठी बातमी : अखेर डॅडी तुरुंगातून बाहेर, १८ वर्षांनी अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका!

नागपूर : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची १८ वर्षांनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाच्या जीआरने ओबीसी नेते नाराज, भुजबळांची मंत्रिमंडळ बैठकीला अनुपस्थिती तर हाके संतापले

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी काढलेल्या जीआरनंतर मराठ्यांची मुंबई मोहीम फत्ते जरी झाली असली, तरी आता

लग्नासाठी धारावीला तरुणींची नापसंती

मुंबई: धारावीत राहणाऱ्या, लग्नासाठी इच्छुक असलेल्या तरूणांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे.