दक्षिण आफ्रिकेतील १२ चित्ते भारतात दाखल

ग्वाल्हेर (वृत्तसंस्था): प्रोजेक्ट चित्ता अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा हवाई दलाच्या विशेष विमानाने दक्षिण अफ्रिकेतील नामिबियातून आणखी १२ चित्ते भारतात दाखल झाले आहेत. या चित्त्यांना भारतीय वायुसेनेच्या गॅलेक्सी ग्लोबमास्टर सी १७ या विशेष विमानामधून ग्वाल्हेर या ठिकाणी आणण्यात आलं आहे.


या १२ चित्त्यांपैकी सात नर आणि पाच मादी आहेत. भारतातील चित्त्यांची संख्या वाढवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेने भारतासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. या अंतर्गत केंद्र सरकार प्रोजेक्ट चित्ता राबवत आहे.


मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या चित्त्यांना कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येणार आहे. हे चित्ते कुनो नॅशनल पार्कमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना आधी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना मुख्य पार्क मध्ये सोडले जाणार आहे.






मोदी सरकारने १७ सप्टेंबर २०२२ या दिवशी म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी देशात ८ चित्ते आणण्यात आले होते. या चित्त्यांची चर्चा देशभर चांगलीच झाली. नामिबियातून हे चित्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आणण्यात आले होते.
Comments
Add Comment

फास्टॅग वार्षिक पास १ एप्रिलपासून महाग होणार

नवी दिल्ली : पुढील महिन्यापासून म्हणजेच १ एप्रिलपासून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना थोडा

युद्धामुळे महागणार विमान प्रवास?

नवी दिल्ली : मध्य पूर्वेतील तणावाचे चटके आता विमान प्रवासालाही बसणार आहेत. इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यात

Dharmantar Bandi Kayda : सावधान! बळजबरीने किंवा आमिषाने धर्मांतर केल्यास...राज्य सरकारचा धर्मांतर बंदी कायद्याचा नवा प्रस्ताव सादर

मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सक्तीच्या आणि फसव्या धर्मांतरांना लगाम घालण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे.

भारताच्या जहाजांना धोका नाही

इराणकडून मैत्रीचा हात पुढे नवी दिल्ली : पश्चिम आशियात इराण-इस्रायल तणावामुळे जागतिक सागरी व्यापार धोक्यात आला

इराण युद्धामुळे भरपूर नफा ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा नवी दिल्ली  : ज्या देशांमध्ये युद्ध होते, त्यांचे अतोनात

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता वितरित

मुंबई: सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक