जगातील सर्वात प्रदूषित शहरांत मुंबई दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगातील सर्वात प्रदूषित दहा शहरांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबईतील वाढते प्रदूषण हे मुंबईकरांच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनले आहे. जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये पाकिस्तानातील लाहोर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर ठरले आहे. मात्र पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मुंबईचा दुसरा क्रमांक पाहता प्रदूषणामुळे हैराण झालेली जनता पाहता दिवसेंदिवस मुंबईकरांनी काळजी घेणे आवश्यक बनले आहे.


स्विस एअर ट्रॅकिंग इंडेक्स आयक्यू एअर नुसार मुंबईने भारतातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीला मागे टाकले आहे. ही आकडेवरी २९ जानेवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यानची असून देशातही दिल्लीला दुसऱ्या स्थानी ढकलत मुंबई पहिल्या स्थानावर असलेली दिसून येत आहे.
जगातील सर्वात प्रदूषित शहरे


१. लाहोर (पाकिस्तान)
२. मुंबई (भारत)
३. काबूल (अफगाणिस्तान)
४. काओशुंग (तैवान)
५. बिश्केक (किर्गिस्तान)
६. अक्रा (घाना)
७. क्राको (पोलॅंड)
८. दोहा (कतार)
९. अस्ताना (कझाकिस्तान)
१०. सॅटियागो (चिली)


मुंबईतील प्रदूषण नियंत्रण आणि हवेची गुणवत्ता नियंत्रित राहण्यासाठी दिल्ली, गुरुग्राम, लखनौप्रमाणे एअर प्युरीफायर टॉवर मुंबई महानगरात देखील बसवण्यात यावेत. त्याचबरोबर शहरी वनीकरण वाढेल यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बीएमसीला दिल्या आहेत.



उपाययोजनांचा अभाव


मुंबईत अनेक रुग्णांमध्ये सर्दी, खोकला, घसा खवखवणे या सारख्या समस्या वाढल्या आहेत. दिवसेंदिवस मुंबईतील हवा गुणवत्ता खालवत चालल्याने अनेकांना अशा आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अद्याप राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाकडून वाढत्या प्रदूषणावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. हृदय आणि फुफ्फुसाचे विकार बळवण्याचा अंदाज देखील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्याच्या काळात खासकरून श्वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक

मुंबईत आता जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात होणार नाही पाणीकपात, महापालिकेने असे घेतले हाती काम...

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनींमध्ये बिघाड झाल्यास दुरुस्तीच्या काळामध्ये

भारत सागरी सप्ताह २०२५ मध्ये ५५,९६९ कोटी रुपयांचे १५ सामंजस्य करार

भारत सागरी आर्थिक महासत्ता होण्यात महाराष्ट्राचे योगदान मोलाचे ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकारातून समृद्धी आणणार: मंत्री अमित शाह

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण मुंबई : सहकाराच्या माध्यमातून

भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कार्यालय हे मंदिरासमान

भाजपच्या नव्या प्रदेश कार्यालयाचे अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुंबई : भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी