'महाविकास आघाडीची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली'

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून मोदींवर झालेल्या टीकेला भाजपा नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबतीला ‘गोल्डन गँग’ होती आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे याच ‘गोल्डन गँग’चे सदस्य होते, अशी टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली. यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडली आहे अशा शब्दांत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.





आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटलंय, ‘‘तपास यंत्रणा यांना आता विंचू, मगरी सारख्या वाटतात, पण २५ वर्षे मुंबईकरांचे रक्त शोषून भ्रष्टाचार केलात त्याचे काय? कुठल्या गोल्डन गँग विषयी इशारे करताय? याकुब, नवाब, हसीना पारकर, सरदार शहावली खान ही तुमची दाऊद गँग केव्हाच उघडी पडलेय. पंतप्रधान बोलले त्याची एवढी सुपारी लागली?"




शेलार पुढे लिहितात, होय! मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छातीठोकपणे सांगितले, ‘एक अकेला कितनों पर भारी है…!’ हे शब्द काही जणांसाठी “धौतीयोग”सारखे लागलेत. ज्यांना ही “मात्रा” लागू पडली त्यांना मळमळ, जळजळ होणारच ! आजच्या सामनाच्या अग्रलेखातून बरिच “ऍसिडिटी” फ्लश झालेय! होऊ दे एकदम साफ!!
Comments
Add Comment

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मुंबई : राज्याच्या ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राज्यमंत्री मेघना

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या आनंदाची बातमी, १ जूनपासून...

मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबई: आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पुन्हा घुमली 'वनराणी'ची शिट्टी

- बॅटरीवर चालणाऱ्या इंजिनासह आधुनिक सेवा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई :

आयुष्मान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेत खासगी रुग्णालयांचा सहभाग वाढवा; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आवाहन

मुंबई : मुंबई महानगर परिसरातील नामांकित खासगी रुग्णालयांनी राज्य शासनाच्या एकत्रित आयुष्मान भारत-प्रधानमंत्री

Ritu Tawde : मिठी नदीतील गॅस साठा म्हणजे 'भ्रष्टाचाराचा कचरा'; रितू तावडे यांचा 'पेंग्विन सेने'वर घणाघाती प्रहार!

मुंबई : भाजप नेत्या आणि महापौर रितू तावडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून एक आक्रमक पोस्ट शेअर करत उद्धव ठाकरे