खडवली रेल्वे स्थानकात ईलेव्हेटरची मागणी

कल्याण : खडवली रेल्वे स्थानकात ईलेव्हेटर अभावी अपंग, गर्भवती महिला आणि वृद्धांची गैरसोय होत असल्याने लवकरात लवकर सरकता जिना उभारावा अशी मागणी, मनसेच्या दिनेश बेलकरे यांनी केली आहे.


मध्य रेल्वेच्या खडवली स्थानकातून दररोज हजारो प्रवासी रेल्वेचा प्रवास करतात. परंतु मुलभूत सुविधांच्या मानाने, हे स्थानक नेहमीच दुर्लक्षित राहिलेले आहे. प्रसाधनगृहाची स्वच्छता ही तर महत्वाची समस्या आहे. स्मार्टकार्ड तिकीट प्रणाली कार्यान्वित नसल्याने अनेक प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत बराच वेळ उभे राहावे लागते. त्यामुळे अनेकदा ट्रेन सोडावी लागते. स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या संरक्षण भिंतीमुळे, प्रवाशांना स्थानकावर जाण्यासाठी असलेला एकमेव जीना, खडतर पायऱ्यांमुळे चढण्या आणि उतरण्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. कित्येकदा प्रवाशी जिन्यावरून उतरताना पडतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, स्थानकावर जाण्यासाठी ईलेव्हेटर उपलब्ध नाही त्यामुळे अपंग, गर्भवती महिला आणि वृध्दांची प्रचंड गैरसोय होत आहे.


खडवली स्टेशन प्रबंधक/व्यवस्थापक नक्की काय व्यवस्थापन करतात असा संतप्त सवाल मनसेचे दिनेश बेलकरे यांनी केला आहे आणि युद्धपातळीवर काम करुन लवकरात लवकर ईलेव्हेटर उभारावे अशी मागणी देखील केली आहे.

Comments
Add Comment

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस

ठाणे-बोरिवली भुयारीकरणाला मार्चपासून सुरुवात

ठाणे : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाअंतर्गत ठाण्याच्या लॉन्चिंग शाफ्ट येथे 'नायक' नावाच्या टनेल बोअरिंग

महावितरणने एका झटक्यात फेडले १२ हजार कोटींचे कर्ज

मुंबई : देशातील सर्वात मोठी वीज वितरण कंपनी असलेल्या महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या

अणुऊर्जा क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले होणार

संसदेत आज सादर होणार विधेयक नवी दिल्ली : भारत एका मोठ्या ऊर्जा सुधारणेकडे वाटचाल करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी