तुर्कीतील भूकंपात एक भारतीय बेपत्ता, तर १० दुर्गम भागात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये मृतांचा ११ हजार २०० हून अधिक झाला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये एक भारतीय अडकल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार बेंगळुरू मधील एक व्यापारी तुर्कीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही सांगितले की ८५० लोक इस्तंबूलच्या आसपास आहेत, २५० अंकारामध्ये आहेत आणि उर्वरित देशभरात पसरलेले आहेत. दरम्यान १० भारतीय नागरिक तुर्कीच्या दुर्गम भागात अडकले असून ते सुरक्षित आहेत.


सोमवारी पहाटे झालेल्या भीषण भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये त्यापैकी एकट्या तुर्कीमध्ये ८ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास ५० हजारहून अधिक लोक जखमी झाले.



तुर्कस्तानमध्ये बिझनेस ट्रिपला गेलेला भारतीय बेपत्ता


परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बेपत्ता भारतीय बेंगळुरूमधील कंपनीत काम करत होता आणि तुर्कस्तानच्या व्यावसायिक दौऱ्यावर होता. सरकार त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.


दरम्यान, तेथील बचावकर्ते ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या भीषण भूकंपानंतर भारताने पाठवलेली साहित्य आणि बचावकार्याची मदत तेथे पोहोचली आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू