तुर्कीतील भूकंपात एक भारतीय बेपत्ता, तर १० दुर्गम भागात...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तान आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपामध्ये मृतांचा ११ हजार २०० हून अधिक झाला आहे. दरम्यान या भूकंपामध्ये एक भारतीय अडकल्याची बातमी समोर येत आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.


परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार बेंगळुरू मधील एक व्यापारी तुर्कीमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने असेही सांगितले की ८५० लोक इस्तंबूलच्या आसपास आहेत, २५० अंकारामध्ये आहेत आणि उर्वरित देशभरात पसरलेले आहेत. दरम्यान १० भारतीय नागरिक तुर्कीच्या दुर्गम भागात अडकले असून ते सुरक्षित आहेत.


सोमवारी पहाटे झालेल्या भीषण भूकंपामुळे दोन्ही देशांमध्ये त्यापैकी एकट्या तुर्कीमध्ये ८ हजार ५०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर जवळपास ५० हजारहून अधिक लोक जखमी झाले.



तुर्कस्तानमध्ये बिझनेस ट्रिपला गेलेला भारतीय बेपत्ता


परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बेपत्ता भारतीय बेंगळुरूमधील कंपनीत काम करत होता आणि तुर्कस्तानच्या व्यावसायिक दौऱ्यावर होता. सरकार त्याच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहे.


दरम्यान, तेथील बचावकर्ते ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खराब हवामानामुळे बचाव कार्यात प्रचंड अडचणी येत आहेत. या भीषण भूकंपानंतर भारताने पाठवलेली साहित्य आणि बचावकार्याची मदत तेथे पोहोचली आहे.

Comments
Add Comment

Loud DJ music kills 140 chickens : उत्तर प्रदेशमध्ये डीजेच्या भयानक आवाजाने १४० कोंबड्यांचा मृत्यू; DJ चालकावर FIR दाखल

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) सुलतानपूर (Sultanpur) जिल्ह्यातून एक अतिशय विचित्र आणि तितकीच धक्कादायक घटना

अमेरिकेने भारताला परत केल्या ६५७ दुर्मिळ वस्तू, वस्तूची किंमत ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

America returns 657 rare items to India : भारतातून अनेक प्राचीन वस्तू, मूर्ती यांची त्यांच्या दुर्मिळतेमुळे परदेशांमध्ये तस्करी (smuggling)

1 may labour day : १ मे रोजी बँका सुरू राहणार की बंद ? नवीन माहिती पहा

मुंबई : उद्या, १ मे रोजी बँकांना सुट्टी असणार का? १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झालेल्या कामगार चळवळीची आठवण

Crime Jharkhand : आधी प्रियकरावर पैसा उडवला नंतर प्रियकराच्या प्रेमात भयानक करून बसली, थेट आईलाच...

Jharkhand Crime : झारखंडची राजधानी रांचीमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका ५० वर्षाच्या महिलेची हत्या

Raja Raghuvanshi Case: 11 महिन्यांनतर सोनम जेलमधून बाहेर, पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित

शिलॉन्ग  Shillong : राजा रघुवंशी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ उडवून दिली होती. याच राजा रघुवंशी हत्या प्रकरणात

भीषण ! एक्स्प्रेसवेवर धावत्या कारला आग , अल्पवयीन मुलीसह 5 जणांचा करून अंत

दिल्ली : दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गावर भीषण दुर्घटना झाली आहे. मुलाची नोकरी मिळवण्याची इच्छा पूर्ण