मुंबई- गोवा महामार्गाचे काम २०२४ पू्र्वी पूर्ण होणार

मुंबई: मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम फेब्रुवारी २०२४ पूर्वी पूर्ण केले जाईल, असे महाराष्ट्र सरकारने मुंबई उच्च न्यायालयासमोर सादर केलेल्या महामार्गाच्या रुंदीकरण आणि सुधारणा कामाच्या अनुपालन अहवालात म्हटले आहे.


दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) पहिल्या ४२ किमी लांबीच्या दुरुस्तीचे काम २८ फेब्रुवारीपर्यंत आणि ४२ ते ८४ किमी लांबीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल असे म्हटले आहे. याआधीच्या सुनावणीत राज्य सरकारने पनवेल ते इंदापूर हा पट्टा सोडून उर्वरित पट्ट्यातील महामार्ग रुंदीकरणाचे काम डिसेंबर २०२३ मध्ये पूर्ण होईल, अशी माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली होती. त्याआधीही अनेकवेळा राज्य सरकारने महामार्गाचे काम पूर्ण करण्याच्या तारखा वारंवार बदलल्या होत्या आणि त्यासाठी न्यायालयाने ताशेरेही ओढले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य सरकार व प्राधिकरणाच्या कामावर समाधान दर्शवत अनुपालन अहवालावर याचिकाकर्ते ओवेस पेचकर यांचे मत विचारले. त्यावर पेचकर यांनी महामार्गाचे बरेच काम पूर्ण केल्याचे मान्य केले. मात्र, सुरक्षेसंदर्भात काही त्रुटी असल्याचे न्यायालयाला सांगितले होते.

Comments
Add Comment

Satbara Utara : ऐतिहासिक निर्णय! ६० लाख कुटुंबांना मोठा दिलासा; भूखंड विनाशुल्क नियमित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश, ३ कोटी नागरिकांना थेट लाभ

मुंबई : राज्यातील नागरिकांसाठी एक ऐतिहासिक आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. तुकडेबंदी

Nashik Malegaon Crime News : सूडापोटी 'सैतानी कृत्य'! ३ वर्षीय चिमुरडीचं लैंगिक शोषण करून डोकं दगडाने ठेचून...गांभीर्याने तपास सुरू

मालेगाव : नाशिक (Nashik News) जिल्ह्यातील मालेगाव तालुका सध्या एका हादरवून टाकणाऱ्या आणि अमानुष घटनेने स्तब्ध झाला आहे.

Ahilyanagar News : बिबट्याच्या भीतीने शाळांच्या वेळेत तातडीने बदल! अहिल्यानगर-पुण्यातील तालुक्यांत पहिली ते चौथीसाठी वेगळी, तर माध्यमिकसाठी वेगळी वेळ जाहीर

अहिल्यानगर : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांतील काही तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे स्थानिक

कडाक्याच्या थंडीत पुणे पालिकेची शेकोटीवर बंदी! प्रदुषण नियंत्रणासाठी घेतला निर्णय

पुणे: राज्यभरात मागील आठवड्यांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे शरीराला ऊब मिळावी म्हणून अनेकजण शेकोटी

पुण्यात गुरुवारी पाणीबाणी, पाणी जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

पुणे : पुणे शहरातील जलकेंद्रांच्या दुरुस्ती कामामुळे गुरुवार २० नोव्हेंबर रोजी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद

Maharashtra Cabinet Meeting : एकाच बैठकीत ६ मोठे निर्णय! परवडणारी घरे उपलब्ध होणार; फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात 'म्हाडा पुनर्विकास' धोरणावर शिक्कामोर्तब

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज, १८ नोव्हेंबर रोजी, राज्य मंत्रिमंडळाची