खारघरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? अधिकारी म्हणाले...

पनवेल : खारघर आणि परिसरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. यातून फुटपाथही सुटलेले नाहीत. काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी कार्यालये थाटली आहेत. मात्र पनवेल महापालिकेचा अतिक्रमण विभाग त्यावर कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.


खारघर नोड हा मोठा परिसर आहे. तेथे अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. पनवेल पालिकेचा अतिक्रमण विभाग तात्पूरती कारवाई करतो. त्यातही बड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप येथील नागरिक करतात. सेक्टर १६ येथे फुटपाथवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले आहे. युफोरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेनेही फुटपाथवर कार्यालय थाटले आहे. सेक्टर ३४ मध्ये पेठ गावाजवळ निळकंठ ग्रुपचे कार्यालयही फुटपाथवर आहे. त्यामुळे फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी आहे की अतिक्रमण करणारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.


फुटपाथवर ही अतिक्रमणे होईपर्यंत पालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याने पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खारघर येथील अतिक्रमण विभागाचे जितेंद्र मढवी यांना याबाबत विचारले असता त्यांनी पाच जणांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यात त्यांनी स्वतःहून ती हटवली नाहीत तर पालिका ती हटवेल, असे सांगितले.

Comments
Add Comment

माजी लोकसभाध्यक्षांना 'ब्रह्मभूषण' पुरस्कार जाहीर

मुंबई : माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा

महापरिनिर्वाण दिनी नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; सत्ताधाऱ्यांची सकारात्मक प्रतिक्रिया

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर स्थानकाच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा

नियोजित कामं सुरळीत पार पडली तर पुढील महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे आपण लोकार्पण करु- मुख्यमंत्री

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकाचे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नियोजित

गोरेगाव-सांताक्रूझ दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

वांद्रे-वर्सोवा सी लिंकवरील जोड मार्गाच्या कामाला गती

आतापर्यंत २२ टक्के काम पू्र्ण मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य

Mahaparinirvan Din: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले - राज्यपाल आचार्य देवव्रत

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था -- मुख्यमंत्री