खारघरमध्ये अतिक्रमणांवर कारवाई कधी होणार? अधिकारी म्हणाले...

पनवेल : खारघर आणि परिसरात अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. यातून फुटपाथही सुटलेले नाहीत. काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांनी कार्यालये थाटली आहेत. मात्र पनवेल महापालिकेचा अतिक्रमण विभाग त्यावर कारवाई करत नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.


खारघर नोड हा मोठा परिसर आहे. तेथे अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला आहे. पनवेल पालिकेचा अतिक्रमण विभाग तात्पूरती कारवाई करतो. त्यातही बड्यांच्या अतिक्रमणांवर कारवाई केली जात नाही, असा आरोप येथील नागरिक करतात. सेक्टर १६ येथे फुटपाथवर अतिक्रमण करून बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले आहे. युफोरिया सहकारी गृहनिर्माण संस्थेनेही फुटपाथवर कार्यालय थाटले आहे. सेक्टर ३४ मध्ये पेठ गावाजवळ निळकंठ ग्रुपचे कार्यालयही फुटपाथवर आहे. त्यामुळे फुटपाथ नागरिकांना ये-जा करण्यासाठी आहे की अतिक्रमण करणारांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.


फुटपाथवर ही अतिक्रमणे होईपर्यंत पालिकेचा अतिक्रमण विभाग काय करत होता, असा सवाल उपस्थित झाला आहे. पनवेल शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे होत असल्याने पालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. खारघर येथील अतिक्रमण विभागाचे जितेंद्र मढवी यांना याबाबत विचारले असता त्यांनी पाच जणांना नोटिसा दिल्या असल्याचे सांगितले. ही अतिक्रमणे काढण्यासाठी सात दिवसांची मुदत आहे. त्यात त्यांनी स्वतःहून ती हटवली नाहीत तर पालिका ती हटवेल, असे सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला