मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भाजप प्रणीत एनडीए सरकार अदानी प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अदानी प्रकरण केवळ देशच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चेत आहे. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लाऊन धरला आहे. प्रामुख्याने काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक आहे.
हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा रिपोर्ट आला आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेली कथीत आर्थिक अफरातफर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या सरकारी संस्थांबद्दलही चिंता व्यक्त होते आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षही जोरदार आक्रमक झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि संसदेबाहेरही याच मुद्द्यावरुन काँग्रेस आवाज उठवत आहे. काँग्रेस पक्षाने अदानी प्रकरणावरुन आज देशभर आंदोलने सुरु केल आहेत.
काँग्रेस खासदार संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत आहेत. तर एनएसयूआय-युथ काँग्रेस संसद पोलीस ठाणे हद्दीतील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत.
आग्रा : उत्तर प्रदेशमधील आग्रामध्ये एक धक्कादायक आणि चटपटीत घटना घडली आहे. एका विवाहितेच्या खोलीतून…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…