मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रात असलेल्या भाजप प्रणीत एनडीए सरकार अदानी प्रकरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. अदानी प्रकरण केवळ देशच नव्हे तर, आंतरराष्ट्रीय पातळीवरही जोरदार चर्चेत आहे. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत लाऊन धरला आहे. प्रामुख्याने काँग्रेस या मुद्द्यावरुन आक्रमक आहे.
[caption id="attachment_831872" align="alignnone" width="1280"]
छाया :अरूण पाटील[/caption]हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेचा रिपोर्ट आला आणि भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाला जोरदार झटका बसला. अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये झालेली कथीत आर्थिक अफरातफर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीमुळे लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एलआयसी) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) या सरकारी संस्थांबद्दलही चिंता व्यक्त होते आहे. याच मुद्द्यावरुन काँग्रेस पक्षही जोरदार आक्रमक झाला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि संसदेबाहेरही याच मुद्द्यावरुन काँग्रेस आवाज उठवत आहे. काँग्रेस पक्षाने अदानी प्रकरणावरुन आज देशभर आंदोलने सुरु केल आहेत.
काँग्रेस खासदार संसदेच्या आवारात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करत आहेत. तर एनएसयूआय-युथ काँग्रेस संसद पोलीस ठाणे हद्दीतील एसबीआय आणि एलआयसी कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहेत.