पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

कसब्यातून हेमंत रासने तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप निवडणूक लढणार


पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भाजपने उमेदवार जाहीर केले. यामध्ये हेमंत रासने यांना कसब्यातून तर चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे कसबा विधानसभा मतदार संघात टिळक कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. मात्र भाजपने त्यांच्या जागी हेमंत रासने यांनी उमेदवारी दिली आहे.


या निवडणुकीत भाजपने दिवंगत मुक्ता टिळक यांच्या कुटुंबाला डावलले अशी चर्चा होत असतानाच यावर पालकमंत्री आणि भाजपनेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


चंद्रकांत पाटील म्हणाले की, देवेंद्रजी आणि मी टिळक कुटुंबाला भेटून योग्य ते स्थान देण्यात येईल, अशाप्रकारे आश्वस्त केले आहे. त्यांनी देखील पक्षासोबत राहू असे म्हटले आहे. तसेच जगताप यांच्या कुटुंबात कोणताही वाद नव्हता. लक्ष्मण जगताप यांच्या मुलाने समजदारी दाखवली. आमचं कुटुंब कोणीही तोडू शकणार नाही. ज्याला उमेदवारी मिळेल त्याच्या पाठिंशी संपूर्ण कुटूंब राहिल, असे त्यांच्या मुलाने सांगितल्याचे पाटील यांनी म्हटले.


टिळक कुटुंबाला डावलण्यात आले का, या प्रश्नावर पाटील म्हणाले की, टिळक कुटुंबाशी चर्चा करून ही निवडणूक जिंकणे किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले. त्यावर शैलेंद्र टिळक आणि कुणालला महाराष्ट्राचा प्रवक्ता म्हणून घोषित केले आहे. टिळक कुटुंबाच्या पाठिशी आम्ही आहोत, असेही पाटील यांनी म्हटले.

Comments
Add Comment

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या

'सांगली-सातारा येथील सराफ व गलाई बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी गृह विभाग स्वतंत्र कक्ष स्थापन करणार'

मुंबई : देशभरात सोन्या-चांदीच्या व्यवसायात नाव लौकिक मिळवलेल्या सांगली आणि सातारा जिल्ह्यातील गलाई बांधव आणि

घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष स्थापन

मुंबई: इराण - इस्राईल युध्दाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या घरगुती व व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडर

'एआय' तंत्रज्ञानाच्या मदतीने गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवणार; मत्स्यव्यवसाय विकास मंत्री नितेश राणेंनी दिली माहिती

मुंबई: राज्यात गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर सुरू