अंबरनाथ येथील बहुल वस्तीचा लवकरच कायापालट

अंबरनाथ:  अंबरनाथ मतदार संघातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रातील विकास कामांकरिता आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नांतून अल्पसंख्याक विभागाच्या बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान योजनेअंतर्गत ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.


अंबरनाथ पश्चिम येथील प्रभाग क्र.२८ उलन चाळ बसेरा, बटीयार खाना पासून ते जहीर शेख यांच्या घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे, उलनचाळ मधील युसुफ शेख यांच्या घरापासून रफिकलाला यांच्या घरापर्यंत पायवाट तयार करणे. प्रभाग क्र.२३ मधील मदनसिंग गार्डनच्या बाजूची पत्राचाळ जवळील ड्रेनेज लाईन व गटार लाईनचे नूतनीकरण करणे आणि प्रभाग क्र.२१ मधील डी.एम.सी.न्यू. कॉलनी वुळन चाळ परिसर ते संदीप मांजरेकर यांच्या घरापासून प्रिन्स अपार्टमेंट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. तसेच उल्हासनगर - ५ येथील पॅनल क्र.१९ मधील क्रांती नगर, इंदिरा नगर विठ्ठल नगर आणि नेहरू नगर येथे सी.सी.रस्ता व गटार बनविणे, पॅनल क्र.२० मधील पटेल नगर येथील मस्जिद जवळ सी.सी.पायवाटा व गटार बनविणे इत्यादी विकास कामे करण्यात येणार आहेत. या विकास कामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी मतदार संघातील नागरीकांच्या वतीने आभार मानले आहेत.

Comments
Add Comment

जिल्ह्यात ४५४ बालके कुपोषित

उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा अभाव अलिबाग : महिला व बालविकास विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रायगड

मुलुंड कचराभूमीतील कचरा विल्हेवाट प्रकल्पाला फेब्रुवारी २०२६ची मुदत

कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे ६८ टक्के काम पूर्ण मुंबई : मुलुंड कचराभूमीतील कचऱ्याच्या डोंगरांची शास्त्रीय

'कैरी' सिनेमातून सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची निखळ मैत्री १२ डिसेंबरला येणार स्क्रीनवर

सिद्धार्थ जाधव आणि सायली संजीवची ‘कैरी’मधील मनाला भिडणारी दोस्ती, दोघांचा इमोशनल बॉण्ड ठरणार लक्षवेधी मैत्री

निवडणुकीच्या कामाला नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसंदर्भांतील विविध कामे प्रशासनाने युद्धपातळीवर हाती घेतली आहेत.

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा