देशात प्रबळ इच्छाशक्तीचे सरकार - राष्ट्रपती

  110

नवी दिल्ली : आपल्याला आत्मनिर्भर भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. जिथे गरीबी नसेल आणि मध्यमवर्ग श्रीमंत असेल. तरुणांनी काळाच्या दोन पावले पुढे व्हावे, असा भारत असावा, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना व्यक्त केल्या.


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पहिल्यांदाच संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले. मुर्मू यांचे आगमन होताच संपूर्ण सभागृहाने त्यांचे टेबल वाजवून स्वागत केले.


त्या पुढे म्हणाल्या की, संसदेच्या या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना मला आनंद होत आहे. काही महिन्यांपूर्वीच देशाने आपल्या स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण करून अमृतकालमध्ये प्रवेश केला. अमृतकालचा २५ वर्षांचा काळ हा स्वातंत्र्याचे सुवर्ण शतक आणि विकसित भारत घडवण्याचा काळ आहे.


आपल्यासमोर एक युग निर्माण करण्याची संधी आहे. यासाठी १०० टक्के कार्यक्षमतेने काम करावे लागेल. आपल्याला २०४७ पर्यंत असे राष्ट्र घडवायचे आहे, ज्यात भूतकाळाचे वैभव आणि आधुनिकतेचा प्रत्येक सुवर्ण अध्याय आहे. आपल्याला स्वावलंबी भारत बनवायचा आहे. जो मानवी जबाबदाऱ्या पार पाडण्यास सक्षम आहे. आपल्याला हव्या असलेल्या आधुनिक पायाभूत सुविधा देशात तयार होऊ लागल्या आहेत. आज भारतात डिजिटल नेटवर्क आहे. ज्यातून विकसित देशही प्रेरणा घेत आहेत. देशाला भ्रष्टाचारापासून मुक्ती हवी होती, त्यातून स्वातंत्र्य मिळत आहे. आज वेगवान विकास आणि दूरगामी दृष्टी घेऊन घेतलेल्या निर्णयांसाठी देश ओळखला जात आहे. जगातील दहाव्या अर्थव्यवस्थेतून आपण पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. येत्या २५ वर्षात विकसित भारताचा आत्मविश्वास वाढवणारा हा पाया आहे.


मी देशवासियांचे आभार मानते की, त्यांनी सलग दोन वेळा स्थिर सरकार निवडले. सरकारने राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले. सर्जिकल स्ट्राईकपासून ते दहशतवादावर कारवाई करण्यापर्यंत, नियंत्रण रेषेपासून एलएसीपर्यंत प्रत्येक वाईट प्रयत्नाचा नायनाट करण्यात आला. कलम ३७० ते तिहेरी तलाकपर्यंत निर्णायक निर्णय घेणारे सरकार ही सरकारची ओळख बनली असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये