उत्तर प्रदेशमध्ये १५.४४ कोटी मतदारांची सखोल तपासणी

आता उरलेत १२ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशमध्ये मतदारांची विशेष सखोल चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. निवडणूक आयोगाने ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केली आहे. मतदार विशेष सखोल पडताळणीअंतर्गत झालेल्या तपासणीत असे दिसून आले आहे की, मतदार यादीत २५ लाखांपेक्षा अधिकांचे नाव एकापेक्षा अनेक ठिकाणी होते. त्यामुळे उत्तर प्रदेशातील मतदारयादीत असणाऱ्या तब्बल १५ कोटी ४४ लाख मतदारांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही नावे मतदारयादीतून वगळली जाण्याची शक्यता आहे. आता ६ मार्च रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. २ कोटी १७ लाख मतदारांची नावे दुसऱ्या यादीत समाविष्ट झाली आहेत. तर, ४६ लाख २३ हजार मतदारांचा मृत्यू झाला आहे. २५ लाख ४७ हजार मतदारांची नावे एकापेक्षा अधिक ठिकाणी होती. तर आता उत्तर प्रदेशात २ कोटी ५५ लाखांहून अधिक मतदार आहेत.


गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी : गाजियाबादमधून सर्वाधिक नावे कमी करण्यात आली आहेत. नव्या ड्राफ्ट मतदार यादीनुसार, गाजियाबादमधून ८ लाख १६ हजार नावे कापण्यात आली आहेत. तसंच, सहारनपूर लोकसभा मतदारसंघातून जवळपास ३ लाख मतदारांची नावे कमी झाली आहेत. काँग्रेसचा गड असलेल्या अमेठीमधूनही २ लाख ६७ हजार नावे कमी झाली आहेत. यातील अनेकजण इतरत्र स्थायिक झाले आहेत, तर काहींचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण पत्त्यावर सापडले नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.


१५ हजार पोलिंग स्टेशन्स : निवडणूक आयोगाने प्रत्येक राजकीय पक्षाकडे ड्राफ्ट मतदार यादीची प्रत दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिणवा यांनी म्हटलंय की एका पोलिंग स्टेशनवर १२०० हून अधिक वोटर नसतील. त्यामुळे नवीन पोलिंग स्टेशनही बनवण्यात आले आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाकडून ६ दिवसांची मुदत घेण्यात आली होती. परिणामी १५ हजारांहून अधिक पोलिंग स्टेशन बनले आहेत. उत्तर प्रदेशात मतदार विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया ४ नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाली होती. २६ डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालली. या दरम्यान अनेकवेळा अंतिम मुदत वाढवण्यात आली. या काळात उत्तर प्रदेशातील तब्बल १५.४४ कोटी मतदारांची सखोल चौकशी करण्यात आली.

Comments
Add Comment

Totapuri mango : तोतापुरी आंबा क्षेत्राच्या सर्वसमावेशक मूल्यांकनासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश

नवी दिल्ली : आंध्रप्रदेशातील तोतापुरी आंबा उत्पादकांना भेडसावणाऱ्या आव्हानांचे परीक्षण करण्यासाठी आणि या

PM Internship Scheme : प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तिसऱ्या टप्प्यात तरुणांसाठी मोठी संधी

पुणे : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून

Anti Terror Operation : जैशच्या ८ संशयित दहशतवाद्यांना अटक

गुजरात : देशाची सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली असून, गुजरात एटीएस (Gujarat ATS) आणि दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) केलेल्या

Indian Armed Forces: संरक्षण दलांची युद्धसज्जता वाढवण्यासाठी 52,000 कोटी रुपयांच्या भांडवली खरेदी प्रस्तावांना मंजुरी

नवी दिल्ली : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 03 जुलै 2026 रोजी झालेल्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने

Indus Waters Treaty : दहशतवादाला मदत आणि प्रोत्साहन देणार्‍या पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित

नवी दिल्ली : भारताने (India) पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी धोरणावर आणि सीमापार दहशतवादाला मिळणाऱ्या

Child Safety : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह जाहिरातींवर सरकारची कारवाई; मेटाकडून मागवले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारतातील इन्स्टाग्रामवर बाल लैंगिक शोषणाला (Child sexual abuse) प्रोत्साहन देणाऱ्या कथित आक्षेपार्ह