‘आय लव्ह मोखाडा’ ठरतोय सेल्फी पाईंट

मोखाडा: मोखाडा शहरात प्रवेश करतांना नजरेत येणारा तलाव आहे, या तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले असून, “ I Love Mokhada"(‘आय लव्ह मोखाडा’) हा नामफलक चाकरमान्यांसह स्थानिकांसाठी सेल्फी पाईंट ठरत आहे. मोखाडा शहर स्वच्छ व सुंदर दिसावे, भविष्यात मोखाड्यात पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत़.

दिवसभरातील कामाचे टेन्शन कमी करण्यासाठी मोखाड्यातील तलाव हा येथील नागरिक तसेच प्रवाशांचा सायंकाळी विरंगुळाचे ठिकाण ठरत होता़ ग्रामीण भागातील नागरिक शासकीय कार्यालयातील कामानिमित्त व वैयक्तिक कामानिमित्त तालुक्यात आल्यानंतर पार्किंगची समस्या निर्माण होत होती, परंतु अशा वेळेस मोखाड्याचा तलाव पुन्हा एकदा पार्किंगचे ठिकाण बनत असे़ मात्र, यावेळी मोखाडा नगरपंचायत नगराध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतून तलावाजवळ लावलेला “ I Love Mokhada " हा नामफलक आता सेल्फी पाईंट ठरत आहे.

स्थानिक नागरिकांसह तालुक्याला येणाऱ्या चाकरमान्यांना तलावाजवळ लावलेल्या या नामफलकाचे कौतुक वाटत असून, बरेचजण येथे आपला सेल्फी काढून तो सोशल मीडियाद्वारे शेअर करीत आहेत़ तसेच बऱ्याचशा नागरिक, प्रवाशांनी आपले हे सेल्फी स्टेटसला सुध्दा ठेवले आहे. तर काही नागरिक आपआपल्या मोबाइलद्वारे नामफलकांसह स्वत:चा फोटो सेल्फीद्वारे चित्रबद्ध करीत आहेत, हे विशेष.
Comments
Add Comment

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची

मानखुर्दचा SMS एन्व्होक्लीनचा भस्मीकरण प्रकल्प २१ महिन्यांत हलविणार

मुंबई : मानखुर्द व शिवाजीनगर भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन मानखुर्द शिवाजी विधानसभा क्षेत्रातील

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कॅनडाचे तंत्रज्ञान महाराष्ट्रात वापरणार

मुंबई : महाराष्ट्रातील शेतीला आधुनिकतेची जोड देण्यासाठी राज्य सरकारने आता जागतिक स्तरावर पावले उचलली आहेत. कृषी

भूमि अभिलेख विभागाचा सुधारित आकृतीबंध मंजूर, नव्या ९९४ पदांची भर पडणार

मुंबई : जमिनीच्या कायदेशीर नोंदी वेगवान होऊन जनतेला दिलासा देण्यासाठी राज्याच्या भूमिअभिलेख विभागाचा

अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर सरकारचा बडगा

३१ मार्चपर्यंत दंडवसुलीचे आदेश; सुनावणीनंतर १५ दिवसांच्या आत वसुलीची प्रक्रिया मुंबई : राज्यातील अवैध गौण खनिज

रस्ते बांधण्याचे काम ९० टक्के भूसंपादन झाल्यानंतरच सुरू होणार

मुंबई : भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होऊन ९० टक्के जमीन प्रत्यक्ष ताब्यात आल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरूवात