सरकारी कर्मचाऱ्यांनी कामचुकारपणा केला तर, पेन्शन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी तसेच पेन्शन बंद केल्या जाणार आहेत. यामुळे आता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कामात चालढकल करता येणार नाही. यासाठी केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक नियमांमध्ये बदल केले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारेही आता यासंबंधीचे बदल करण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते.


केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम २०२१ बाबत केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली होती. त्यात आता पेन्शन नियम २०२१ च्या नियम ८ मध्ये नवीन तरतुदी लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे सेवेदरम्यान कर्मचाऱ्याच्या संदर्भात गंभीर गुन्हा अथवा दोष आढळल्यास त्याचे सेवानिवृत्ती पेन्शन अथवा ग्रॅच्युइटी बंद केली जाण्याचे सांगितले जात आहे. या नव्या बदलांची नियमावली संबंधित अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसंदर्भातील अशी कारवाई करण्याचे अधिकार कार्यालय प्रमुखास देण्यात आले आहेत. नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यावर विभागीय चौकशी, न्यायालयीन चौकशी, कारवाई प्रलंबित असल्यास त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागणार आहे. यामध्ये कर्मचारी दोषी आढळल्यास त्याची पेन्शन आणि ग्रॅच्युइटी दिली जाणार नाही. दोषानुसार कर्मचाऱ्यांची पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी कायमस्वरूपी अथवा काही काळासाठी बंद केली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Comments
Add Comment

संसदेत ई-सिगारेट वादाने खळबळ; अनुराग ठाकूर यांच्या आरोपांवर टीएमसीची जोरदार प्रतिक्रिया

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभेत ई सिगारेट या एका मुद्द्यावरून गदारोळ निर्माण

ऐतिहासिक सन्मान! युनेस्कोच्या वारसा यादीत 'दिवाळी'चा समावेश

नवी दिल्ली : भारताची गौरवशाली आणि निरंतर चालत आलेली परंपरा असलेल्या दीपावली सणाला अखेर जागतिक स्तरावर ऐतिहासिक

नेहरू-गांधी कुटुंबांकडून तीन वेळा मतचोरी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरोप फक्त दोन मते िमळूनही नेहरू झाले पंतप्रधान ! नवी दिल्ली : नेहरू-गांधी

गोवा नाईटक्लब मालक लुथरा बंधूंविरुद्ध मोठी कारवाई,पासपोर्ट निलंबित

नवी दिल्ली : गोवा पोलिसांच्या विनंतीनंतर लुथरा बंधूंचे पासपोर्ट निलंबित करण्यात आले आहेत. सरकार त्यांचे

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून