आजही येथे रुग्ण डोलीतून आरोग्यकेंद्रात येतात...

वामन दिघा
मोखाडा : १ लाख लोकसंख्या असलेला आणि जवळपास ९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील आरोग्यकेंद्रे केवळ शोभेच्या वास्तू बनत चाललेल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपुऱ्या सुविधांअभावी या डोंगर, दरी-खोऱ्यांच्या परिसरातील ग्रामस्थांना उपचारासाठी नाशिक, मुंबई, ठाणे गाठावे लागत आहे़.


मोखाडा तालुक्यात आसे, मोर्हांडा, वाशाळा, खोडाळा ही चार प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत. एकीकडे शासन दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च प्राथमिक आरोग्यकेंद्रावर करीत असतांनाही आजही दुर्धर आजारांवरील उपचारासाठी ग्रामस्थांना मात्र ग्रामीण रुग्णालय अथवा शहरी जावे लागत आहे.


आजही या परिसरात कुपोषण, बालमृत्यू पूर्णत: थांबलेले नाहीत. विशेषत: धामोडी, कुडवा, करोळी, धामणी, बिवलपाडा हे गावपाडे आजही आरोग्य सेवांपासून वंचित आहेत. तालुक्यापासून या गावांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत नसल्याने या गावांतील रुग्णांना, गरोदर मातांना आरोग्यकेंद्रात येताना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत़. आरोग्यकेंद्राचे अथवा खासगी वाहन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आदिवासी रुग्णांना डोलीचा आधार घेत आरोग्यकेंद्र गाठावे लागत आहे.

Comments
Add Comment

संपलेल्या पक्षासोबत युती, तब्बल ८० जागा टाकणार झोळीत

उबाठा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी, बंडखोरी होण्याची शक्यता मुंबई (विशेष प्रतिनिधी) : उबाठा आणि मनसेची युती

खासदार, आमदार, माजी आमदारांची आपल्या नातेवाईकांसाठी तिकीटाकरता फिल्डींग

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुती आणि ठाकरे बंधूंची युतीची झालेली असून

माजी खासदार राहुल शेवाळेंची वहिनी थेट धारावीतून लढणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शिवसेनेचे सरचिटणीस आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांची वहिनी वैशाली शेवाळे या

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल

मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री