आजही येथे रुग्ण डोलीतून आरोग्यकेंद्रात येतात...

वामन दिघा
मोखाडा : १ लाख लोकसंख्या असलेला आणि जवळपास ९९ टक्के आदिवासी बहुल असलेल्या मोखाडा तालुक्यातील आरोग्यकेंद्रे केवळ शोभेच्या वास्तू बनत चाललेल्या आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अपुऱ्या सुविधांअभावी या डोंगर, दरी-खोऱ्यांच्या परिसरातील ग्रामस्थांना उपचारासाठी नाशिक, मुंबई, ठाणे गाठावे लागत आहे़.


मोखाडा तालुक्यात आसे, मोर्हांडा, वाशाळा, खोडाळा ही चार प्राथमिक आरोग्यकेंद्र आहेत. एकीकडे शासन दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च प्राथमिक आरोग्यकेंद्रावर करीत असतांनाही आजही दुर्धर आजारांवरील उपचारासाठी ग्रामस्थांना मात्र ग्रामीण रुग्णालय अथवा शहरी जावे लागत आहे.


आजही या परिसरात कुपोषण, बालमृत्यू पूर्णत: थांबलेले नाहीत. विशेषत: धामोडी, कुडवा, करोळी, धामणी, बिवलपाडा हे गावपाडे आजही आरोग्य सेवांपासून वंचित आहेत. तालुक्यापासून या गावांकडे जाणारे रस्ते सुस्थितीत नसल्याने या गावांतील रुग्णांना, गरोदर मातांना आरोग्यकेंद्रात येताना अक्षरश: मरणयातना सहन कराव्या लागत आहेत़. आरोग्यकेंद्राचे अथवा खासगी वाहन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने आदिवासी रुग्णांना डोलीचा आधार घेत आरोग्यकेंद्र गाठावे लागत आहे.

Comments
Add Comment

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत