मुंबई: रविवारी मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे हिंदू संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला. राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
दादर शिवाजी पार्क ते कामगार स्टेडियम असा हा विराट मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखाहून अधिक हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणण्याची तयारी हिंदू संघटनांनी केली असल्याचे समजते. विश्व हिंदू परिषदेसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच इतर हिंदू संघटनाही या मोर्चात सामील झाल्या होत्या. या संघटना गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी करत आहेत.
गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रात ४० हून अधिक हिंदू जनक्रोश मोर्चे निघाले, पण आजचा मोर्चा खूप मोठा असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करावा, अशी या संघटनांची मागणी आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे. अवैध इस्लामिक धार्मिक स्थळांवर कारवाई करावी. लँड जिहादवर कारवाई झाली पाहिजे, अशाही मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात आल्या.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…