'या'साठी दादर शिवाजी पार्कवर हिंदू संघटनांचा मोर्चा

मुंबई: रविवारी मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे हिंदू संघटनांनी जनआक्रोश मोर्चा काढला. राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.


दादर शिवाजी पार्क ते कामगार स्टेडियम असा हा विराट मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रातून एक लाखाहून अधिक हिंदू समाजातील लोकांना एकत्र आणण्याची तयारी हिंदू संघटनांनी केली असल्याचे समजते. विश्व हिंदू परिषदेसह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच इतर हिंदू संघटनाही या मोर्चात सामील झाल्या होत्या. या संघटना गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा लागू करण्याची मागणी करत आहेत.



या मागण्यांसाठी आंदोलन


गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रात ४० हून अधिक हिंदू जनक्रोश मोर्चे निघाले, पण आजचा मोर्चा खूप मोठा असल्याचे सांगण्यात येतेय. महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधात कायदा करावा, अशी या संघटनांची मागणी आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे. अवैध इस्लामिक धार्मिक स्थळांवर कारवाई करावी. लँड जिहादवर कारवाई झाली पाहिजे, अशाही मागण्या या मोर्च्याद्वारे करण्यात आल्या.

Comments
Add Comment

सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील

दक्षिण मुंबईतील बेलासीस पुलाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव; मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

कॅबिनेट मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार ब्रिटिशांच्या

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधानभवन येथे "जावे विनोदाच्या गावा" या कार्यक्रमाचे विशेष आयोजन

श्रेष्ठ लेखकांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन "लोकसेवेचा लोकजागर" ग्रंथाचे प्रकाशन मुंबई : महाराष्ट्र

मुंबई महापालिकेचा महसूल वाढवण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

ग्रीन ब्राँड्ससह सदनिकांची विक्री, करमणूक शुल्क, भूखंडाचा लिलावातून वाढवणार महसूलाची रक्कम मुंबई (विशेष

'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी राजभाषा दिन' यात फरक काय ?

मुंबई : दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' आणि १ मे रोजी 'मराठी राजभाषा दिन' साजरा करतात. ज्येष्ठ कवी

देवनार येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प जून २०२६ पासून होणार सुरु

मुंबई : मुंबईतील देवनार डम्पिंग ग्राऊंडवरील येथे ६०० टन प्रतिदिन महानगरपालिका घन कचऱ्यापासून ७ मेगावॅट वीज