गुरुमाऊलींनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घातली: मुख्यमंत्री

नाशिक (प्रतिनिधी ): गुरुमाऊली प पू अण्णासाहेब मोरे यांनी पारंपारिक आणि आधुनिक शेतीची सांगड घालून शेतकऱ्याच्या उत्कर्षासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून सत्तेवर आलेले आमचे सरकारही सर्वसामान्य जनता आणि शेतकरी केंद्रबिंदू ठरवूनच काम करते आहे. जनता व शेतकरी सुखी व्हावा, हाच अजेंडा घेऊन आम्ही काम करीत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. नाशिकमध्ये पाच दिवसांपासून सुरु असलेल्या श्री समर्थ मार्गाच्या जागतिक कृषी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाला.

डोंगरे वस्तीगृहावर पाच दिवस पार पडलेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या प्रत्येक स्टॉलला भेटी देत मुख्यमंत्र्यांनी तेथील स्टॉल धारकांशी हितगुज साधले. कृषी महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, प. पू. अण्णासाहेब मोरे, चंद्रकांतदादा मोरे, आबासाहेब मोरे,नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, आ. बबन लोणीकर, आ. संजय शिरसाठ, आ. भरत गोगावले, आ. सुहास कांदे, आ. सीमा हिरे, खा. हेमंत गोडसे, भाऊसाहेब चौधरी, अजय बोरस्ते, बंटी तिदमे आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी