प्रभात फेरी दरम्यान विद्यार्थीनीचा मृत्यू

नांदगाव प्रतिनिधी : तालुक्यात सर्वत्र भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात असतानाच जातेगाव येथील ९वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडल्याने दुःखद निधन झाले.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, जातेगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी पूजा दादासाहेब वाघ (वय १५) प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर काढण्यात आलेल्या प्रभात फेरी दरम्यान चक्कर येऊन पडली असता तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता तिची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी तिला पुढील उपचारासाठी नांदगाव ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले असता नांदगाव येथे जात असताना रस्त्यातच तिचे निधन झाले. तिच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान दुपारी तिच्या मृतदेहावर गावात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले.

Comments
Add Comment

Mumbai Crime : संतापजनक! मुंबईत सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा रस्ता रोको आंदोलन

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील पायधुनी परिसरात अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका ७ वर्षांच्या

Thane Crime : क्लिनिंगसाठी आलेल्या महिलेने चोरले ३.५ लाखांचे मंगळसूत्र; ठाणे पोलिसांनी तासाभरात परत मिळवले

ठाणे पोलिसांची कामगिरी, अवघ्या एका तासात मिळवले चोरी झालेले दागिने  ठाणे  : ठाण्यातील (Thane) राबोडी पोलिसांनी जलद

Sunetra pawar : संत ज्ञानेश्वर माऊली'च्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार; वारकऱ्यांसोबत भोजनाचा घेतला

पुणे - सासवड, दि. १२ जुलै - अखंड हरिनामाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती

Swapnapurti Housing Project : नागपूरमध्ये 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण प्रकल्पाचा शुभारंभ; स्वच्छता कर्मचाऱ्यांना मोफत घरे देणार - मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर: नागपूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 अंतर्गत उभारण्यात येणाऱ्या 'स्वप्नपूर्ती' गृहनिर्माण

Girija Raut Case : खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल; निष्पक्ष चौकशीची मागणी

मुंबई : खासदार विनायक राऊत (Vinayak raut) यांच्या सून गिरीजा राऊत (Girija Raut) यांनी पती, सासरे आणि कुटुंबातील अन्य

Devendra Fadnavis : रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी येत्या तीन वर्षात 145 रेल्वे उडाण पुलांचे बांधकाम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील ४८४ कोटी रुपयांच्या ९ पायाभूत सुविधांचे लोकार्पण सुरक्षित व जलद दळणवळण सुविधांच्या बांधकामांना