पंच, सामनाधिकारी म्हणून महिलाच

  73

लंडन (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेकरिता आयसीसीने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रथमच या स्पर्धेतील सर्व सामन्यांत महिला पंच असणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली.


१० फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने ३ सामनाधिकारी आणि १० पंच यांच्या नावाची घोषणा केली आहे.


मॅच रेफरी म्हणून जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका) हे काम पाहतील. पंच म्हणून सू रेडफर्न (इंग्लंड), एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबाग (दक्षिण आफ्रिका), अन्ना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका) यांच्या नावांचा समावेश आहे.


आयसीसीतर्फे इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी सर्व महिला सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार