पंच, सामनाधिकारी म्हणून महिलाच

लंडन (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेकरिता आयसीसीने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रथमच या स्पर्धेतील सर्व सामन्यांत महिला पंच असणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली.


१० फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने ३ सामनाधिकारी आणि १० पंच यांच्या नावाची घोषणा केली आहे.


मॅच रेफरी म्हणून जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका) हे काम पाहतील. पंच म्हणून सू रेडफर्न (इंग्लंड), एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबाग (दक्षिण आफ्रिका), अन्ना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका) यांच्या नावांचा समावेश आहे.


आयसीसीतर्फे इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी सर्व महिला सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

भारत – ऑस्ट्रेलिया T20 थरार सुरू: पहिला सामना २९ ऑक्टोबरला!

Ind vs AUS T20 : दिवाळीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांच्या चाहत्यांचे लक्ष आता T20 क्रिकेटवर वळले आहे. २९ ऑक्टोबर

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.