पंच, सामनाधिकारी म्हणून महिलाच

लंडन (वृत्तसंस्था) : दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेकरिता आयसीसीने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. प्रथमच या स्पर्धेतील सर्व सामन्यांत महिला पंच असणार आहेत. आयसीसीने शुक्रवारी या निर्णयाची घोषणा केली.


१० फेब्रुवारीपासून आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धा सुरू होणार आहे. या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने ३ सामनाधिकारी आणि १० पंच यांच्या नावाची घोषणा केली आहे.


मॅच रेफरी म्हणून जीएस लक्ष्मी (भारत), शांद्रे फ्रिट्झ (दक्षिण आफ्रिका), मिचेल परेरा (श्रीलंका) हे काम पाहतील. पंच म्हणून सू रेडफर्न (इंग्लंड), एलोइस शेरिडन (ऑस्ट्रेलिया), क्लेअर पोलोसाक (ऑस्ट्रेलिया), जॅकलीन विलियम्स (वेस्ट इंडिज), किम कॉटन (न्यूझीलंड), लॉरेन एजेनबाग (दक्षिण आफ्रिका), अन्ना हॅरिस (इंग्लंड), वृंदा राठी (भारत), एन जननी (भारत), निमाली परेरा (श्रीलंका) यांच्या नावांचा समावेश आहे.


आयसीसीतर्फे इतिहासात प्रथमच, दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या आगामी आयसीसी महिला टी२० विश्वचषक २०२३ स्पर्धेसाठी सर्व महिला सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेलची घोषणा केली आहे. क्रिकेटमध्ये महिलांचा सहभाग आणि सामने पाहण्याच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ होण्याच्या आयसीसीच्या धोरणात्मक महत्त्वाकांक्षेचा हा एक भाग असल्याचे बोलले जात आहे

Comments
Add Comment

IND vs SA Test : अवघ्या तीन दिवसांत भारताचा पराभव, मालिकेत पिछाडी, गुवाहाटीत ‘करो या मरो’ सामना

कोलकाता : ईडन गार्डन्सवरील पहिली कसोटी अवघ्या तीन दिवसांत संपली. भारताला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला.

कोलकाता कसोटीचा शेवटचा डाव सुरू, जयस्वाल पाठोपाठ केएल राहुलही बाद

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स

कोलकाता कसोटी तीन दिवसांत संपणार ?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना ईडन

BCCI Update on Shubman Gill Injury : गिलची प्रकृती चिंताजनक? ९ विकेट्सवर टीम इंडियाचा डाव अचानक घोषित; BCCI ने काय खुलासा केला?

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेतील पहिला सामना कोलकात्यात रंगतदार

राजस्थानचा कर्णधार सीएसकेत, तर जड्डू पुन्हा जुन्या संघात

मुंबई : चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील या हंगामातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित ट्रेडची अखेर

दक्षिण आफ्रिका सर्वबाद १५६, भारत एक बाद ३७

कमी प्रकाशामुळे खेळ पहिल्या दिवसाचा खेळ लवकर संपवला कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन