ठाकरे-वंचित युतीचा विचका!

  58

'ठाकरे-आंबेडकर युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही'


गोंदिया : उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला चांगलाच धक्का बसला असून शिवसेना ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित युतीचा विचका झाल्याची राजकीय गोटात चर्चा सुरू आहे.


नुकतेच प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटासोबत युती केली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यात पुन्हा शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली अशी चर्चा सुरू असतानाच आता नाना पटोले यांनी त्यांच्या युतीशी महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही, असे स्पष्ट वक्तव्य केले आहे.


याआधी प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, आमचा विरोध केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आमचे पूर्वी चांगले सख्य होते. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्हाला महाविकास आघाडीत घेण्यासाठी विरोध करणार नाही, असा विश्वास वाटतो. मात्र नाना पटोलेंच्या या विधानामुळे आंबेडकर यांना महाविकास आघाडीत स्थान मिळेल का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

Comments
Add Comment

‘निर्मल दिंडी’च्या माध्यमातून संतांचे संदेश प्रत्यक्षात उतरविण्याचे काम-मुख्यमंत्री

मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 'निर्मल दिंडी', 'चरणसेवा' आणि 'आरोग्यवारी' उपक्रमाचा

आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या

महाराष्ट्र हादरला! धावत्या रिक्षात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

रिक्षा चालक जाफर खान सुबेदार खान अटक अकोला: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीयेत.

फडणवीस यांनी मानले राज यांचे आभार!

मुंबई: देवेंद्र फडणवीस हे आषाढीच्या निमित्ताने आज पंढरपूरमध्ये आहेत. पंढरपुरात पत्रकारांनी प्रश्न विचारला

Amravati News : भयानक...अमरावतीत १३ फूट लांबीच्या अजगराने घेतला बकरीचा जीव

अमरावती : तालुक्यातील सुरवाडी खुर्द शेत शिवार परिसरात एका १३ फूट लांबीच्या अजगराने २० किलो वजनाची बकरी

चोरांनी मोबाईल टॉवर्सनाही सोडले नाही! लातूरमध्ये नेटवर्क मशीन्स चोरल्याप्रकरणी तिघांना अटक

लातूर: चोर काय चोरतील काही सांगता येत नाही, साखळी चोर, मोबाइल चोरपासून तर बरेच आहेत पण लातूर जिल्ह्यामधील