एटीएम कार्डद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी गजाआड

  62

धुळे: एटीएम कार्डची अदलाबदली करून मजुरांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळक्याला सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्यावर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.


मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग असणाऱ्या कारमध्ये एक टोळी परिसरात टेहळणी करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील तसेच संदीप पाटील, संतोष पाटील ,जयेश मोरे, इसार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा यांना दहिवद गावाकडे रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई केली. चौकशीअंती या टोळक्याने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तसेच भिवंडी, पिंपरी चिंचवड, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पेल्हार या ठिकाणीही चोरी केल्याची बाब उघडकीस आली.



एटीएम वापरतांना अशी घ्या काळजी


पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी नागरिकांना एटीएम कार्ड वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून मदत न घेता बँकेचा सुरक्षा रक्षक किंवा संबंधित कर्मचारी याचीच मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.



सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत


धुळे जिल्ह्यात देखील बऱ्याच एटीएम सेंटरवर संबंधित बँकेने सुरक्षा रक्षक नेमलेले नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे देखील सदोष असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधित बँकांना जनतेची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या