एटीएम कार्डद्वारे लाखो रुपयांचा गंडा घालणारी टोळी गजाआड

धुळे: एटीएम कार्डची अदलाबदली करून मजुरांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळक्याला सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले आहे. या टोळक्यावर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.


मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग असणाऱ्या कारमध्ये एक टोळी परिसरात टेहळणी करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील तसेच संदीप पाटील, संतोष पाटील ,जयेश मोरे, इसार फारुकी, योगेश मोरे, मुकेश पावरा यांना दहिवद गावाकडे रवाना होण्याचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने कारवाई केली. चौकशीअंती या टोळक्याने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तसेच भिवंडी, पिंपरी चिंचवड, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पेल्हार या ठिकाणीही चोरी केल्याची बाब उघडकीस आली.



एटीएम वापरतांना अशी घ्या काळजी


पोलीस अधीक्षक बारकुंड यांनी नागरिकांना एटीएम कार्ड वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून मदत न घेता बँकेचा सुरक्षा रक्षक किंवा संबंधित कर्मचारी याचीच मदत घेण्याचा सल्ला दिला आहे.



सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत


धुळे जिल्ह्यात देखील बऱ्याच एटीएम सेंटरवर संबंधित बँकेने सुरक्षा रक्षक नेमलेले नाही. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे देखील सदोष असल्याची बाब निदर्शनास आली आहे. या संबंधित बँकांना जनतेची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे