पुण्यातील मोहसीन शेख हत्या प्रकरणातील धनंजय देसाईसह २० आरोपींची निर्दोष मुक्तता

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात आयटी इंजिनियर असलेल्य मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. परंतु संपूर्ण पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या हत्या प्रकरणातील सर्व २० आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.


मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई आणि इतर २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. जून २०१४ साली पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.


जून २०१४ मध्ये सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने पीएमपीएलच्या बसगाड्या जाळल्या होता. त्यानंतर महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या संशयावरून मोहसीनची आरोपींकडून हत्या करण्यात आली होती.


सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला मोहसीन पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. दुपारी नमाज अदा करण्यासाठी तो एका मशिदीत गेला होता. नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर येताच सायकलीवरून आलेल्या काही आरोपींनी अचानक त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्यामुळे मारहाणीत मोहसीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मोहसीनची हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहसीन शेख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाईसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. परंतु उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात अचानक काम करणे थांबवले होते. त्यानंतर आता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जाणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

Comments
Add Comment

सेवानिवृत्त एस.टी. कर्मचाऱ्यांना पत्नीसह वर्षभर मोफत प्रवास करता येणार; मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: एस.टी. कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त पुण्यातून धावणार ३३४ उन्हाळी विशेष ट्रेन

पुणे : परीक्षा संपली की वेध लागतात ते सुट्टीचे, बाहेरगावी फिरायला जायचे, त्यामुळे उन्हाळ्यात रेल्वेवर

बोगस डॉक्टरांचे रॅकेट उद्ध्वस्त करणार; विधानपरिषदेत मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये फोफावलेल्या बोगस डॉक्टरांच्या जाळ्यावर आता राज्य सरकार

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील १० हजार गावांसाठी...

अहिल्यानगर: हवामानातील सतत होणारे बदल हे कृषी क्षेत्रासमोर मोठे आव्हान बनले असून त्याचा थेट परिणाम शेती

Chhatrapati Sambhajinagar: आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाची हत्या; अखेर थरारक प्रकार उघड

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाचा खून केल्याची

पुण्यात मेट्रोचे २०० किमीचे जाळे उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे मेट्रो भवनचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पुणे :  पुणे मेट्रो प्रकल्पामुळे शहरातील