पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात आयटी इंजिनियर असलेल्य मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे संपूर्ण पुण्यात खळबळ उडाली होती. परंतु संपूर्ण पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या हत्या प्रकरणातील सर्व २० आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.
मोहसीन शेख हत्या प्रकरणात हिंदुराष्ट्र सेना प्रमुख धनंजय देसाई आणि इतर २० जणांवर आरोप ठेवण्यात आले होते. जून २०१४ साली पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.
जून २०१४ मध्ये सोशल मीडियावर अज्ञात व्यक्तींकडून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये तणाव निर्माण झाला होता. संतप्त जमावाने पीएमपीएलच्या बसगाड्या जाळल्या होता. त्यानंतर महाराजांबाबत वादग्रस्त पोस्ट शेयर केल्याच्या संशयावरून मोहसीनची आरोपींकडून हत्या करण्यात आली होती.
सोलापूर जिल्ह्याचा रहिवासी असलेला मोहसीन पुण्यात एका आयटी कंपनीत काम करत होता. दुपारी नमाज अदा करण्यासाठी तो एका मशिदीत गेला होता. नमाज पठण केल्यानंतर मशिदीबाहेर येताच सायकलीवरून आलेल्या काही आरोपींनी अचानक त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. धारदार शस्त्रांनी वार करण्यात आल्यामुळे मारहाणीत मोहसीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर मोहसीनची हत्या प्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोहसीन शेख हत्या प्रकरणातील कायदेशीर लढाईसाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. परंतु उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात अचानक काम करणे थांबवले होते. त्यानंतर आता मोहसीन शेख हत्या प्रकरणातील आरोपींची मुक्तता करण्यात आल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास कोणत्या दिशेने जाणार, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…