मुख्यमंत्री डावोसमध्ये केवळ चार तास झोपले

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डावोसमध्ये केवळ चार तास झोपले, असा दावा शिंदे गटातचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दीपक केसरकर म्हणाले, काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंडमधील डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी गेले होते. या दौऱ्यावेळी एकनाथ शिंदे तब्बल ७६ तास डावोसमध्ये होते. या दौऱ्यादरम्यान ते फक्त चार तास झोपले.



दिपक केसरकरांचे आरोपाला प्रत्युत्तर


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डावोस दौऱ्यात तब्बल ३५ ते ४० कोटींचा खर्च झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या आरोपांना उत्तर देण्यासाठी दीपक केसरकर यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, डावोस दौऱ्यामुळे हजारो कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डावोसमध्ये जाणं गरजेचं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ७६ तास डाव्होसमध्ये होते आणि यावेळी ते केवळ चार तास झोपले. ७२ तास त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न केले”, असंही केसरकर म्हणाले.



आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद


केसरकर यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप फेटाळून लावत, आदित्य ठाकरेंना वयामुळे अनुभव नाही, हे आम्ही समजू शकतो. म्हणून रोज काही तरी बोलायचं आणि स्वत:चं हसं करून घ्यायचं, हे योग्य नाही. जगभरातील लोक डावोसमध्ये चार्टर्ड विमानानेच येतात. चार्टर्ड विमानाने प्रवास केला म्हणजे फार मोठा गुन्हा केला, असं होत नाही. यापूर्वी अनेक मुख्यमंत्र्यांनी चार्टर्ड विमानाने प्रवास केला आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हास्यास्पद आहेत.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा