राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदिल

नवी दिल्ली : “आता साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र’ यावरच चर्चा झाली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे स्पष्ट केले.


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही
माहिती दिली.


दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्यांचा आढावा घेता अमित शहा यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुजय विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शहा यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


यावेळी शिंदे यांनी अमित शहा यांचे आभार मानत महाराष्ट्रातील साखर उद्योगांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, या विषयांचा आढावा घेत साखर उद्योगातील अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजनांवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

Gudi Padwa 2026 Muhurat: गुढीपाडव्याचा इतिहास काय आहे?, जाणून घ्या मुहूर्त, पूजा आणि विधी

मुंबई: हिंदू धर्मात गुढीपाडवा सणाला अतिशय महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस चैत्र शुद्ध

महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..!, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

मुंबई: 'महाराष्ट्रधर्म वाढवुया...मराठीची गुढी उंच उभी करुया..' या आकांक्षेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

राज्यातील सर्व जमिनींच्या फेरफार नोंदी तपासणार; महसूलमंत्र्यांची घोषणा

मुंबई: महसूल कायद्यातील कलम १५५ चा गैरवापर करून जमिनीच्या नोंदीत फेरफार करणाऱ्या आणि सर्वसामान्यांच्या जमिनी

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे