राज्याच्या मंत्रीमंडळ विस्ताराला केंद्राचा हिरवा कंदिल

  137

नवी दिल्ली : “आता साखर उद्योग आणि सहकार क्षेत्र’ यावरच चर्चा झाली असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल, असे स्पष्ट केले.


केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही
माहिती दिली.


दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बैठकीसाठी दिल्लीत बोलावले होते. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना अनेक अडचणी येत असल्याच्या बातम्यांचा आढावा घेता अमित शहा यांनी सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुजय विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, अभिमन्यू पवार, धनंजय महाडिक हे सुद्धा नेते दिल्लीत अमित शहा यांच्या कार्यालयात दाखल झाले होते. या बैठकीनंतर अमित शहा यांची एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही बैठक झाली. या बैठकींमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.


यावेळी शिंदे यांनी अमित शहा यांचे आभार मानत महाराष्ट्रातील साखर उद्योगांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी मार्जिंग आणि वर्किंग कॅपिटल, इनकम टॅक्सचे पेंडिंग विषय, लोनचा विषय, या विषयांचा आढावा घेत साखर उद्योगातील अडचणी आणि त्यांना सशक्त करण्यासाठीच्या योजनांवर अतिशय सकारात्मक चर्चा झाली, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून