बेस्टकडून १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव

  110

मुंबई (प्रतिनिधी) : बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे १८ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे महागाईमुळे त्रस्त असणाऱ्या मुंबईकरांना लवकरच आणखी एक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


यामुळे एप्रिलपासून मुंबईकरांच्या वीज बिलांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे वीज दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवर यांनी वीज दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. त्यामध्ये आता बेस्टनेही दरवाढ सुचवली आहे. त्यामुळे मुंबईकरांना महागाईची झळ आणखी सोसावी लागण्याची चिन्हे आहेत. बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळारा आहे. या वीज ग्राहकांसाठी बेस्टने ६ टक्के शुल्क कमी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास मुंबईकरांना महागाईचा झटका बसणार आहे. महावितरणकडून भांडुप, मुलुंड या भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो. वीज दरवाढीबाबत आता प्रस्ताव सादर झाल्यानंतर वीज नियामक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीनंतर वीज नियामक आयोगाकडून अंतिम दरवाढ जाहीर करण्यात येईल.


एकीकडे महागाईच्या झळा सर्वसामान्य माणूस सोसत असताना आता वीज दरवाढीचा शॉक बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य वीज नियामक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मुंबई शहरात बेस्ट आणि टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. तर, मुंबई उपनगरात अदानी पॉवर, टाटा पॉवर आणि काही भागांमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो.



युनिट आणि वीज दरवाढ


दरम्यान या वर्षीसाठी बेस्टने वीज दरवाढीत १८ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये १८ टक्केपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट पर्यंत १८ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव बेस्टकडून ठेवला आहे. तर १०१ ते ३०० युनिट पर्यंत ६ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. तर ३०१ ते ५०० युनिट व त्यापुढे सुद्धा दोन टक्के पर्यंत वीज दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

राज ठाकरेच्या घरच्या गणपतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतले दर्शन, शिवतीर्थवर काय झाली चर्चा?

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले असून, सकाळपासून अनेक राजकीय लोकांची वर्दळ

वसई इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला! ७ जणांचा मृत्यू तर ९ जखमी

पालघर: वसई तालुक्यातील नारंगी रोड वरील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत लगतच्या चाळीवर कोसळल्यामुळे आज

मुंबईतील 'हे' १२ पूल गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी धोकादायक! BMC चा निर्वाणीचा इशारा

१२ पुलांवरून श्रीगणेश मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आवाहन मुंबई : बृहन्मुंबई

अखेर मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर परवानगी मिळाली, पण...

आझाद मैदानावर मराठा आंदोलनासाठी मुंबई उच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी दिली मुंबई: मराठा आरक्षणाच्या

जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली शेकडो मराठा मुंबईच्या दिशेने रवाना, कुठून कसे येणार? जाणून घ्या सविस्तर-

मुंबई: गेल्या काही वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप सुटत नसल्याकारणामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या

मुंबईकरांना दिलासा: गणेशोत्सवात 'एलिफस्टन पूल' सुरू राहणार; अनंत चतुर्दशीनंतर होणार पाडकाम

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. प्रभादेवी येथील