बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पुण्यात महिलेला जाळण्याचा प्रयत्न

पुणे : बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी पुण्यात एका महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.


रमजान खलील पटेल (वय ६०, नवीन म्हाडा वसाहत, भीमनगर मुंढवा) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार रमजान पटेल हा फिर्यादीचा ओळखीचा आहे. त्याने २०१८ मध्ये पीडित फिर्यादीला फिरायला जाऊ असे सांगून तिला बाहेर नेले. यावेळी त्याने फिर्यादीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पीडितेने आरोपी रमजान विरोधात सोलापूर जिल्ह्यातील पांगरी येथे तक्रार दिली होती. या प्रकरणी सोलापूर न्यायालयात खटला सुरू आहे.


दरम्यान, फिर्यादी ज्या ठिकाणी राहते त्या इमारतीत काही दिवसांपूर्वी आरोपी रमजान हा कुटूंबासह राहण्यास आला. यानंतर त्याच्यावरील बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी रमजानने तिला धमकावण्यास सुरुवात केली. बुधवारी तिला रमजानने राहत्या बिल्डिंग खाली शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून पीडिता सुदैवाने बचावली.


तिने तत्काळ पोलिसांत धाव घेत या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या