भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने काँग्रेस गोटात खळबळ

मुंबई : काँग्रेसमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील मोठा भूकंप होणार असल्याचे भाकीत भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय गोटात खळबळ उडली आहे.


सुजय विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे ठरावीक लोकच मलाई खात होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे एकनाथ शिंदे हे निमित्तमात्र ठरले. मात्र शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी अस्वस्थता होती. तशीच अस्वस्थता आता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. इतर पक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील मंत्री देखील त्यांचे काम करत नव्हते. त्यामुळे भविष्यकाळात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल.


सुजय विखे पाटील म्हणाले, प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे. हेच काँग्रेसचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगून पक्षाला काहीच योगदान दिले नाही. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केले. त्यामुळे अनेक युवक बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच शेवटचा तरुण राहणार आहे. तो म्हणजे राहुल गांधी.

Comments
Add Comment

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी

कॉल सेंटरमध्ये बेकायदेशीर उद्योग! सीबीआयने आवळल्या मुसक्या, केली मोठी कारवाई

कल्याण: सीबीआयने अलिकडेच महाराष्ट्रातील नाशिक आणि कल्याणमधील इगतपुरी येथील एक बेकायदेशीर कॉल सेंटरचा भंडाफोड

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या