भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने काँग्रेस गोटात खळबळ

मुंबई : काँग्रेसमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचे मोठे वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील सत्तांतर नाट्यानंतर अनेक नेते ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आता काँग्रेसमध्ये देखील मोठा भूकंप होणार असल्याचे भाकीत भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय गोटात खळबळ उडली आहे.


सुजय विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे ठरावीक लोकच मलाई खात होते. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे एकनाथ शिंदे हे निमित्तमात्र ठरले. मात्र शिवसेनेच्या आमदारांमध्ये जशी अस्वस्थता होती. तशीच अस्वस्थता आता काँग्रेसच्या आमदारांमध्ये आहे. इतर पक्षच नव्हे तर त्यांच्या पक्षातील मंत्री देखील त्यांचे काम करत नव्हते. त्यामुळे भविष्यकाळात काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप होईल.


सुजय विखे पाटील म्हणाले, प्रत्येकजण आपली खुर्ची सांभाळण्यात व्यस्त आहे. हेच काँग्रेसचे दुर्देव आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी सत्ता भोगून पक्षाला काहीच योगदान दिले नाही. नव्या पिढीला वारंवार नाकारून त्यांना लांब केले. त्यामुळे अनेक युवक बाहेर पडले. त्यामुळे काँग्रेसमध्ये एकच शेवटचा तरुण राहणार आहे. तो म्हणजे राहुल गांधी.

Comments
Add Comment

Cabinet Decision: मंत्रिमंडळाचे ३ मोठे निर्णय: २,२२८ नवी पदे, ५ लाख रोजगार, ५०० कोटींचा निधी!

हायकोर्टात बंपर भरती; महाराष्ट्र बांबू धोरण २०२५ जाहीर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेसाठी ५०० कोटींची

Govind Pansare : गोविंद पानसरे हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट! हायकोर्टाकडून तिघांना जामीन; सर्वच्या सर्व '१२' संशयित आरोपींची सुटका!

कोल्हापूर : कोल्हापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉम्रेड गोविंद पानसरे (Govind Pansare) हत्या प्रकरणासंदर्भात आज एक

Gadchiroli : ब्रेकिंग! गडचिरोली जिल्ह्यात तब्बल ६१ नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण, सरकारला मोठं यश

गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील

महाराष्ट्रात मंकी पॉक्सचा शिरकाव; धुळ्यात आढळला पहिला रुग्ण

धुळे : जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच

कबूतराला वाचवताना ठाण्यात मोठी दुर्घटना; हायटेंशन वायरच्या धक्क्याने अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

२८ वर्षीय उत्सव पाटील शहीद; सहकारी गंभीर भाजला, रूग्णालयात उपचार सुरू ठाणे : ठाणे शहरात दिवा-शील रोडवर रविवारी

राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : आठवडाभरापासून काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा एकदा दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागाने