सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही वाईट

  54

मुंबईचा एक्यूआय ३०६ वर तर दिल्लीतील एक्यूआय २४२ वर


मुंबई : राज्यात सध्या थंडी वाढत आहे. मुंबईच्या वातावरणात गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीत आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०६ वर तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक २४२ वर गेला आहे.


मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील काही दिवसात ३०० पार गेला आहे. मुंबईतील घटते तापमान, वाऱ्यांचा मंद वेग आणि वाहतूक समस्येमुळे हवा गुणवत्ता यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खराब स्थितीत आहे. यामुळे आरोग्य विषयक समस्या, श्वसनाचे विकारसारख्या गोष्टींना मुंबईकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या पुढेच राहणार आहे. मुंबईतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आहे. जो मुंबईकरांसाठी अतिशय धोकादायक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम २.५ चे प्रमाण जास्त असल्याने अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.


मुंबईतील एक्यूआय पुढीलप्रमाणे...




  • कुलाबा - 290

  • नवी मुंबई - 352

  • अंधेरी - 326

  • चेंबूर - 347

  • बीकेसी - 361

  • माझगाव - 322


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम
50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय - मध्यम
201 ते 300 एक्यूआय - खराब
301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय - गंभीर

Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र