सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा दिल्लीपेक्षाही वाईट

मुंबईचा एक्यूआय ३०६ वर तर दिल्लीतील एक्यूआय २४२ वर


मुंबई : राज्यात सध्या थंडी वाढत आहे. मुंबईच्या वातावरणात गारवा जाणवत असला तरी मुंबईतील हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून सलग तिसऱ्या दिवशी मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक दिल्लीपेक्षाही वाईट स्थितीत आहे. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक ३०६ वर तर दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक २४२ वर गेला आहे.


मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक मागील काही दिवसात ३०० पार गेला आहे. मुंबईतील घटते तापमान, वाऱ्यांचा मंद वेग आणि वाहतूक समस्येमुळे हवा गुणवत्ता यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच खराब स्थितीत आहे. यामुळे आरोग्य विषयक समस्या, श्वसनाचे विकारसारख्या गोष्टींना मुंबईकरांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुंबईतील हवा गुणवत्ता निर्देशांक ३००च्या पुढेच राहणार आहे. मुंबईतील हवेत पीएम २.५ चे प्रमाण अधिक आहे. जो मुंबईकरांसाठी अतिशय धोकादायक आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, पीएम २.५ चे प्रमाण जास्त असल्याने अनेक प्रकारचे श्वसनाचे आजार आणि फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना संसर्ग आणि हृदयविकाराचा धोकाही उद्भवू शकतो.


मुंबईतील एक्यूआय पुढीलप्रमाणे...




  • कुलाबा - 290

  • नवी मुंबई - 352

  • अंधेरी - 326

  • चेंबूर - 347

  • बीकेसी - 361

  • माझगाव - 322


हवेचा गुणवत्ता निर्देशांक किती असावा?


शून्य ते 50 एक्यूआय - उत्तम
50 ते 100 एक्यूआय - समाधानकारक
101 ते 200 एक्यूआय - मध्यम
201 ते 300 एक्यूआय - खराब
301 ते 400 एक्यूआय - अतिशय खराब
401 ते 500 एक्यूआय - गंभीर

Comments
Add Comment

Maharashtra School : यंदा संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपासून सुरू होणार शाळा

मुंबई : दरवर्षी कडक उन्हाळ्यामुळे विदर्भात ३० जूनपासून तर राज्यात उर्वरित ठिकाणी १५ जूनपासून शाळा सुरू करण्याची

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे विश्लेषण

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचे

जमीन मोजणी होणार आता सुपरफास्ट, प्रत्येक जिल्ह्यात खाजगी भूमापकांची नियुक्ती

मुंबई : जमीन मोजणी प्रकरणांचा निपटारा अचूक, जलद, गुणवत्तापूर्ण व पारदर्शी पद्धतीने व्हावा यासाठी राज्यातील

IRCTC पूर्ण करणार प्रवाशांची काश्मीर ते गोवा फिरण्याची संधी, जाणून घ्या माहिती

मुंबई : फिरण्याची इच्छा असते, पण वेळ आणि बजेटमुळे अनेकदा प्लॅन पुढे ढकलला जातो. अशा प्रवाशांसाठी Indian Railway Catering and Tourism

एप्रिलमध्ये तब्बल इतके बँक हॉलिडेज, ही सुट्ट्यांची यादी जाहीर

मुंबई : एप्रिल महिन्यात कुठे फिरायला जायचा प्लॅन करत असाल, तर बाहेर गावी जायच्या आधी बँक हॉलिडेज नक्की तपासून

इंधन संकटकाळात भारताची श्रीलंकेला मदत; पंतप्रधान मोदींचे केले आभार व्यक्त

मुंबई : इंधन पुरवठ्याच्या अडचणींना सामोरे जात असलेल्या श्रीलंकेच्या मदतीच्या हाकेला भारताने तत्काळ प्रतिसाद