३७ प्रकल्पांना पावणेदोन कोटींचा दंड

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची धडक कारवाई!


मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आणि प्रदूषणविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) विशेष मोहीम हाती घेतली आहे.


शहरातील रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांची अचानक तपासणी केल्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ३७ प्रकल्पांकडून १.८७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर चार प्रकल्पांवर टाळे ठोकण्यात आले. एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम आणि सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह यांच्या उपस्थितीत मुंबईतील वायू प्रदूषणाचा आढावा घेण्यासाठी नुकतीच विशेष बैठक पार पडली. यावेळी, मुंबईसाठी चार आणि नवी मुंबईसाठी दोन विशेष तपास पथके तातडीने कार्यान्वित करण्याचे ठरवण्यात आले.


मोबाईल व्हॅनद्वारे पाहणी


मुंबई महानगर क्षेत्रात हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एकूण ३२ केंद्रे कार्यरत असून, त्यापैकी १४ केंद्रे मुंबई शहरात आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळते, तिथे तत्काळ मोजमाप करण्यासाठी २२ मोबाईल व्हॅन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

NEET-UG 2026 Result : नीट-यूजी परीक्षेचा निकाल जाहीर; परीक्षेत मुलींनी मारली बाजी

मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency - NTA) ने नीट-यूजी (NEET-UG) २०२६ परीक्षेचा निकाल (Result) जाहीर केला आहे. उत्तरतालिका (Answer

MahaCare : महाकेअरच्या माध्यमातून राज्यात जागतिक दर्जाच्या कर्करोग उपचार सुविधा; नागपुरात हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पाला मंजुरी

मुंबई : राज्यातील कर्करोग रुग्णांना जागतिक दर्जाचे उपचार आणि संशोधन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत

Central Railway : कर्जत-लोणावळा रेल्वे मार्ग पूर्णपणे पूर्ववत; 17 जुलैपासून अनेक एक्सप्रेस गाड्या पुन्हा मूळ मार्गावर

मुंबई : कर्जत-लोणावळा (Karjat lonavala) दरम्यानच्या मध्य रेल्वेच्या दक्षिण-पूर्व डाऊन मार्गावरील रेल्वे सेवा पूर्णपणे

Transformation of railway stations : पंतप्रधान मोदी उद्या ७५ स्थानके राष्ट्राला करणार समर्पित; 'अमृत भारत' योजनेचा वेग वाढला

मुंबई: रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात आणि स्थानकांचे रूप पालटावे, या उद्देशाने

Pratap Sarnaik : ओला, उबरसह सर्व कंपन्यांना आता राज्य सरकारचा परवाना बंधनकारक

महाराष्ट्राचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; रिक्षा टॅक्सीप्रमाणे चालकांना बॅच बंधनकारक मुंबई : महाराष्ट्रातील